AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या राष्ट्रीय शिक्षणात बदल काय?, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एस. बिर्डेकर यांनी सांगितलं

या नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बाहेरचे चित्रकार, गायक येतील. ते अधिकचं ज्ञान देतील. शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल.

नव्या राष्ट्रीय शिक्षणात बदल काय?, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एस. बिर्डेकर यांनी सांगितलं
| Updated on: Jul 07, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई : देशातील शिक्षण पद्धतीत बदल झालेत. यानुसार, शालेय शिक्षणात ५, ३, ३, ४ या सूत्रानुसार बदल झाला आहे. ईसीसीई अर्ली चाईल्ड केअर एज्युकेशन हा सुरुवातीचा पायाभूत भाग आहे. संगोपन आणि बालशिक्षण असा भाग त्यात आहे. त्याबाबत चांगला विचार केला आहे. जगातल्या संशोधनाचा अभ्यास करून शिवाय ब्रेन स्टडीजचा अभ्यास करून अभ्यासक्रम ठरवला आहे, अशी माहिती शिक्षणतज्ज्ञ बी. एस. बिर्डेकर यांनी दिली.

शिक्षण आनंददायी हवं

डॉ. बिर्डेकर म्हणाले, ८५ टक्के ब्रेनचा विकास हा शून्य ते सहा या वयोगटात होतो. त्या काळातचं संगोपन आणि शिक्षण चाललं पाहिजे. कृतीप्रधान, आनंददायी शिक्षण असावं. बालकाच्या कृतीला वाव मिळावं, असं असावं. अंकज्ञान, भाषाज्ञान असावं. ही भक्कम व्हावी. त्यानंतर पुढच्या शिक्षणाला मुलं तयार व्हावीत. बालसंगोपन चांगलं झालं तर तुरुंगात जाणाऱ्यांची संख्या जास्त होणार नाही, असंही बिर्डेकर यांनी म्हंटलं.

खेळावर आधारित शिक्षण

या नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बाहेरचे चित्रकार, गायक येतील. ते अधिकचं ज्ञान देतील. शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण हवं. परीक्षा आणि शिक्षण भीतीदायक आहे. पास, नापास होणं याला वलय निर्माण झालं. ते बाजूला काढून शिक्षण द्यायचं आहे. खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाईल. अॅक्टिव्हीटी बेस, खेळाच्या आधारावर शिक्षण दिलं जाईल. गेम मुलांना आवडते. तेच मुलांना देऊ. ताण येणार नाही. शिक्षण अधिक आनंददायी करण्याचा विचार आहे, असंही बिर्डेकर यांनी सांगितलं.

चांगला संवाद करणारी माणसं हवीत

नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षणाला महत्त्व दिलं आहे. गेल्या तीन दशकात सायन्स, टेक्नॉलॉजी, भाषा, कला यांचा अभ्यासक्रमात सहभाग राहणार आहे. दुसऱ्याला मोटिव्हेट कसं करतात, त्यासाठी भाषा महत्त्वाची आहे. चांगला संवाद करणारी माणसं हवी असतात.

युजीसीत बदल करणे गरजेचे आहे. टॉप हंड्रेडमधली लोकं देशात आले पाहिजे. म्हणजे बाहेर जाणाऱ्या मुलांना देशातच शिक्षण उपलब्ध होईल. परदेशी विद्यापीठांना किती मुभा द्याव्या, याचा पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचंही बिर्डेकर यांनी म्हंटलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.