AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं नुकसान, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

कुठल्याही उद्योजकाचा या घटनाबाह्य सरकारवर विश्वास राहिला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हे चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं नुकसान, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 29, 2022 | 9:27 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारचं अपयश लोकांसमोर मांडलं. आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉनबद्दल बोलल्यानंतर आम्ही सांगितलं होतं की, एअरबसच्या तरी मागे लागा. तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा. शेतीचं नुकसान होतंय. आपण उद्योग जगातात चौथा मोठा प्रकल्प बाहेर निघून गेलाय. पहिला मोठा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉनचा. हा प्रकल्प पुण्यात आणणार होतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की, तो महाराष्ट्रामध्येच येणार आहे. ऑगस्टपर्यंत त्याच्या बैठका चालल्या. सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातमध्ये निघून गेला.

दुसरा प्रकल्प म्हणजे बल्क ड्रग्स पार्क. मी अनेकदा सांगितलं आहे आपल्याकडं ३९४ फार्मसी कॉलेज आहेत.ड्रग्स प्रोडक्शनमध्ये आपणं हायस्ट असू. बल्क ड्रग्स पार्क अन्य राज्यांना दिले गेले. हे पार्क रायगड जिल्ह्यात येणार होते. पण, महाराष्ट्रात काही हे आणू शकले नाही, असे ताशेरे आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर ओढले.

तिसरा प्रकल्प होता मेडिकल डिव्हाईस पार्क. हे संभाजीनगर जिल्ह्यात येणार होतं. तिथं अशीच मोठी गुंतवणूक आली असती. त्यासोबत अनेक क्लस्टर इंडस्ट्रीज आल्या असत्या. पण, यातही सरकार अपयशी ठरलंय.

चौथ्या प्रकल्पाबाबत आम्ही जुलैपासून आरडाओरडा करतोय. एअर बस टाटा तरी जाऊ देऊ नका. तो आज प्रकल्प आपल्या हातातून गेला आहे.

प्रत्येक राज्य अशा प्रकल्पासाठी प्रयत्न करतात. करार करून राज्यात प्रकल्प घेऊन जातात. डबल इंजिनचं सरकार म्हणतो. पण, महाविकास आघाडीचं सरकार असताना डबल इंजिन व्यवस्थित चाललेलं.

आता एक इंजिन हे फेल झालेलं आहे. या राज्यात येणारी गुंतवणूक इतर राज्यात गेली. कदाचित तिकडल्या राज्यातल्या निवडणुकीसाठी असेल. ते अजून काही चांगलं देऊ शकत असतील.

कुठल्याही उद्योजकांचा तसेच गुंतवणूकदाराचा या सरकारवर विश्वास राहिला नाही. आम्हाला या सरकारवर विश्वास राहिला नाही. तसंच कुठल्याही उद्योजकाचा या घटनाबाह्य सरकारवर विश्वास राहिला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.