नागपूरकरांनो, पुरेसा पाणीसाठा करुन ठेवा! शहराचा पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार, कारण काय?

| Updated on: Aug 31, 2021 | 7:42 PM

जलवाहिनीच्या दुरुस्ती साठी 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ओसीडब्लू ही पाणीपुरवठा करणारी संस्था आणि महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याची विनंती केली आहे.

नागपूरकरांनो, पुरेसा पाणीसाठा करुन ठेवा! शहराचा पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार, कारण काय?
नागपूर पाणी पुरवठा बंद राहणार
Follow us on

नागपूर : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कन्हान नदीवरील मुख्य जलवाहिनीला मोठं लिकेज आढळून आलं आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्ती साठी 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ओसीडब्लू ही पाणीपुरवठा करणारी संस्था आणि महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याची विनंती केली आहे. यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शहराला पाणी पुरवठा होणार नाही. त्यात सातरंजीपुरा, लकडगंज, नेहरू नगर झोन, आशिनगर झोनमधील 24 जलकुंभाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसंच टँकरनेही पाणी पुरवठा होणार नाही. जलवाहिनीतून होणारी गळती मोठी आहे. गळती मुख्य लाईनवर असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे काम हातात घेण्यात आलं आहे. नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा ओसीडब्लूने व्यक्त केलीय. (Water supply in Nagpur will be cut off on September 2)

नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला!

नागपुरात चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. नागपूर महानगरपालिका प्रशासन झोपेत असून प्रवाशांचे हाल होत असल्याच्या भावना आता नागपूरकर व्यक्त करत आहेत. सध्या या बसस्टॉप चोरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नागपुरात सिवेज लाईनवरील चेंबरची झाकणं चोरीला गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, आता नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रवाशांना उनवारा आणि पावसापासून बचावासाठी आधार असलेले नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप अक्षरशः गायब झालं आहे.

गेली अनेक वर्षे हे म्हाळगीनगर बसस्थानक इथे होते. प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी अख्ख बसस्टॉपच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले. मात्र, यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने काहीही कारवाई न केल्याने परिसरातील प्रवाशांना मात्र याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

नागपूर मेट्रोत ओबीसींना डावलल्याचा आरोप

नागपूर मेट्रोमध्ये पदभरती करताना ओबीसी, एससी आणि एसटी उमेदवारांना डावलण्यात आलंय, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. खुल्या वर्गाच्या उमेदवारांवर मेट्रो प्रशासनानं मेहरबानी दाखवलीय, त्यामुळे मेट्रोतील या पदभरती घोटाळा प्रकरणावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघंही आक्रमक झालाय.ओबीसी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

मेट्रोनं चूक दुरुस्त करावी

‘महामेट्रोनं पद भरती करताना ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय केलाय. मेट्रोनं मोठी चूक केलीय, त्यामुळं मेट्रो प्रशासनानं ही चूक दुरुस्त करावी, अन्यथा मेट्रो विरोधात आंदोलन करू’ असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलाय.

इतर बातम्या :

तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा, नागपूर मारबतसाठी सज्ज, आता सरकारच्या कोरोना गाईडलाईन्सची प्रतीक्षा

हॉर्नचा सूर बदलणार, भारतीय संगीत वापरलं जाणार; नितीन गडकरी यांची माहिती

Water supply in Nagpur will be cut off on September 2