कांद्यावरचा निर्यात कर आधी थांबवला होता आणि निर्यात करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी कांदा आयात केला. निर्यातीवर बंदी घातली. कांद्याचे भाव पडले. हमीभावाने कांद्याचे भाव खरेदी केले नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं पाप नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.