AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा, नागपूर मारबतसाठी सज्ज, आता सरकारच्या कोरोना गाईडलाईन्सची प्रतीक्षा

सध्याचे कोरोना नियम आणि संभाव्य तिसरी लाट यांचे सावट या सणावर आले आहे. या वर्षी मारबत यात्रा निघणार नाही. मात्र, नागपुरात या सणाची तयारी पूर्ण झाली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 10:31 PM
Share
 नागपूर : मारबत हा सण देशात फक्त नागपुरात साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात फक्त नागपुरातच साजरा होत असल्यामुळे त्याच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष असते. या सणाला तब्बल 141 वर्षांची परंपरा आहे.

नागपूर : मारबत हा सण देशात फक्त नागपुरात साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात फक्त नागपुरातच साजरा होत असल्यामुळे त्याच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष असते. या सणाला तब्बल 141 वर्षांची परंपरा आहे.

1 / 5
मात्र, सध्याचे कोरोना नियम आणि संभाव्य तिसरी लाट यांचे सावट या सणावर आले आहे. या वर्षी मारबत यात्रा निघणार नाही. मात्र, नागपुरात या सणाची तयारी पूर्ण झाली आहे. येथील नागरिक हा सण साजरा करण्यासाठी सरकारच्या नियमांची वाट पाहत आहेत.

मात्र, सध्याचे कोरोना नियम आणि संभाव्य तिसरी लाट यांचे सावट या सणावर आले आहे. या वर्षी मारबत यात्रा निघणार नाही. मात्र, नागपुरात या सणाची तयारी पूर्ण झाली आहे. येथील नागरिक हा सण साजरा करण्यासाठी सरकारच्या नियमांची वाट पाहत आहेत.

2 / 5
मारबत हा सण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यामध्ये मारबतची भव्य मिरवणूक काढली जाते. या सणाला तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे यावर्षीची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन मारबतांची वेगवेगळ्या भागातून मिरवणूक निघते. दोन्ही मारबत भव्य असतात. त्यांच्यासोबत बडगे असतात.

मारबत हा सण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यामध्ये मारबतची भव्य मिरवणूक काढली जाते. या सणाला तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे यावर्षीची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन मारबतांची वेगवेगळ्या भागातून मिरवणूक निघते. दोन्ही मारबत भव्य असतात. त्यांच्यासोबत बडगे असतात.

3 / 5
समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे या सणाचे उद्दिष्ट आहे. पिवळी मारबत चांगल्या गोष्टीचे प्रतीक तर काळी मारबत दृष्ट संस्कृतीचे प्रतीक आहे, असे समजले जाते. इंग्रजांच्या काळात लोकांना एकत्रित येता यावे यासाठी याची सुरुवात झाली. मात्र अजूनही ही परंपरा कायम आहे. यात असणारे बडगे हे देशातील विघातक गोष्टीचा निषेध नोंदविणारे असतात.

समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे या सणाचे उद्दिष्ट आहे. पिवळी मारबत चांगल्या गोष्टीचे प्रतीक तर काळी मारबत दृष्ट संस्कृतीचे प्रतीक आहे, असे समजले जाते. इंग्रजांच्या काळात लोकांना एकत्रित येता यावे यासाठी याची सुरुवात झाली. मात्र अजूनही ही परंपरा कायम आहे. यात असणारे बडगे हे देशातील विघातक गोष्टीचा निषेध नोंदविणारे असतात.

4 / 5
जेव्हा मारबत निघते आणि दोन्ही मारबत एका ठिकाणी मिळतात त्यावेळचा क्षण बघण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते. नागपूरच नाही, तर आजूबाजूच्या राज्यातील नागरिकसुद्धा मारबत बघायला येतात. मागच्या वर्षीपासून कोरोनामुळे मारबतची मिरवणूक निघत नाहीये. मात्र मारबत तयार करून पूजा आणि काही लोकांच्या उपस्थितीत त्याच विसर्जन केले जाणार आहे.  मात्र शासनाच्या गाईडलाईनची लोक वाट बघत आहेत.

जेव्हा मारबत निघते आणि दोन्ही मारबत एका ठिकाणी मिळतात त्यावेळचा क्षण बघण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते. नागपूरच नाही, तर आजूबाजूच्या राज्यातील नागरिकसुद्धा मारबत बघायला येतात. मागच्या वर्षीपासून कोरोनामुळे मारबतची मिरवणूक निघत नाहीये. मात्र मारबत तयार करून पूजा आणि काही लोकांच्या उपस्थितीत त्याच विसर्जन केले जाणार आहे. मात्र शासनाच्या गाईडलाईनची लोक वाट बघत आहेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.