नागपुरात तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद; पोलीस ठाण्यासमोरचं एकमेकांविरोधात भिडण्याचे कारण काय?

| Updated on: Jan 29, 2022 | 12:38 PM

बाहेरून आलेल्या गटात पाच तृतीयपंथी होते. तर, स्थानिक पन्नास तृतीयपंथी एकत्र आले. संख्येने कमी असणाऱ्या तृतीयपंथींनी पळ काढला. पाठलाग करणाऱ्यांना एक-दोघांना पकडले. त्यांची चांगलीच धुलाई केली.

नागपुरात तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद; पोलीस ठाण्यासमोरचं एकमेकांविरोधात भिडण्याचे कारण काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

 

 

नागपूर : तृतीयपंथीय हे लोकांकडून पैसे (Money from people) मागतात. त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचे वेगवेगळे गट असतात. बहुधा ते आपआपल्या इलाक्यात फिरतात. त्यामुळं वाद होण्याचा प्रश्न येत नाही. मोतीबागेतील तृतीयपंथी रेल्वेत वसुली (Recovery in Railways) करतात. परंतु, आरपीएफनं त्यांच्यावर वसुलीसाठी निर्बंध लावलेत. त्यामुळं ते हंसापुरी भागात वसुलीसाठी गेले. हंसापुरी भागात आधीच काही तृतीयपंथी वसुली करत होते. बाहेरून कुणीतरी येण्याची भनक त्यांना लागली. जुन्या तृतीपंथींनी नव्याने आलेल्या तृतीयपंथीयांचा पाठलाग केला. आधी यादवनगर आणि त्यानंतर मारवाडी चौकात ते फिरले. बाहेरून आलेल्या गटात पाच तृतीयपंथी होते. तर, स्थानिक पन्नास तृतीयपंथी एकत्र आले. संख्येने कमी असणाऱ्या तृतीयपंथींनी पळ काढला. पाठलाग करणाऱ्यांना एक-दोघांना पकडले. त्यांची चांगलीच धुलाई केली. आमच्या भागात वसुलीसाठी कसेकाय आलेत, याचा जाब विचारला. मार खाणाऱ्यांनी लकडगंज पोलीस (Lakdaganj Police) ठाणे गाठले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं काहीसे प्रकरण निवडले.

जखमी तृतीयपंथी रुग्णालयात

जुन्या तृतीयपंथींनी त्यांच्या भागात आलेल्या नवीन तृतीयपंथींना चांगलाच चोप दिला. त्यामुळं जीवाच्या आकांताने ते लकडगंज पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी मध्यस्थी केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सहपोलीस आयुक्त अश्विनी दोरजे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनीही घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई केली.

टोळीयुद्ध भडकण्याचे संकेत

तृतीयपंथीयांच्या गटांमधील वाद हे नेहमीच होत असतात. वसुली कोण करेल, यावरूनच हे वाद होतात. तृतीयपंथी चमचम गजभियेचा वसुलीच्या असमान वाटपातून खून झाला होता. टोळीच्या मोरक्यावरून खुनाचा आरोप आहे. गल्लीबोळातही तृतीयपंथी वसुलीसाठी फिरतात. रस्त्याच्या चौकाचौकात तर ते हमखास दिसतात. पण, एखाद्याच्या भागात दुसरा वसुली करत असेल, तर त्यांच्यात वाद होतात. ए हमारा इलाखा हैं, म्हणत दुसऱ्या इलाख्यातील तृतीयपंथींना पळवून लावतात. यातूनच टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असते. पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळं ही घटना थोडक्यात आटोपली. पण, अशा घटनांचा उद्रेक केव्हा होईल, काही सांगता येत नाही.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं?

Nagpur Medical | मेडिकलमधील अद्ययावत कँसर हॉस्पिटलचे काय होणार?, बांधकामाचे 33 कोटी परत जाण्याच्या मार्गावर

WhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार?