VIDEO: नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल

| Updated on: Nov 17, 2021 | 11:58 AM

शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली?

VIDEO: नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल
ravikant tupkar
Follow us on

नागपूर: शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नागपूर शहरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.

अन्न त्याग आंदोलन सुरू

तुपकर यांचं नागपुरात ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’ सुरु झालं आहे. कापसाला 12000 रुपये भाव मिळावा, आणि सोयाबीनला 8 हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, या मागणीसाठी तुपकर संविधान चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. नागपुरात जमावबंदीचे आदेश असल्यानं तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावलीय. मग नागपूरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? पोलीसांचा सर्वांना समान न्याय का नाही? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाडा, विदर्भात ठिय्या आंदोलन

दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी मराठावाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी, धरणे आणि ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 19 नोव्हेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

कंगना आणि गोखलेंच्या डोक्यावर परिणाम

दरम्यान, या आधी तुपकर यांनी अभिनेत्री कंगना रणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागमी केली आहे. कंगना रणावतने भारतीय स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अभिनेता विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे या दोघांवरही देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. या दोघांच्याही डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. कंगनाच्या वक्तव्याप्रमाणे 2014 ला जर स्वातंत्र्य मिळाले असेल तर भविष्यात मोदी सरकार आले नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाणार आहोत का? असा सवालही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा

VIDEO: वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; राऊतांचा कंगनाला टोला

शाळा, बांधकामे, सर्व ट्रक्स बंदी; CAQM ने जाहीर केली निर्बंधांची यादी