खामोश..! देशाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी आपल्या पार्टीचंसुद्धा ऐकत नाही, काँग्रेसमुळे देशात क्रांती

नोट बंदी असो की मग जीएसटी मी त्यावर बोललो आहे आणि बोलत राहणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मला म्हणाल्या होत्या. तुम्ही बंगालमध्ये जा त्या ठिकाणी तुमचा मोठा विजय होणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणीही यावेळी त्यांनी सांगितल्या.

खामोश..! देशाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी आपल्या पार्टीचंसुद्धा ऐकत नाही, काँग्रेसमुळे देशात क्रांती
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 10:26 PM

नागपूरः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख (Congress Leader Ranjit Deshmukh) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शत्रूग्न सिन्हा (Shatrugna Sinha) यांनी आपल्या हटके शैलीत खामोश म्हणत नागपूरातील कार्यक्रमाच्या भाषणाला प्रारंभ केला. आणि सगळी सभा आपल्या हातात घेतली. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांच्या आवाजात जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी शत्रुग्न यांनी सांगितले की, मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो कारण रणजित देशमुख यांच्या या कार्यक्रमाममध्ये मला सहभागी होता आले. रणजित देशमुख यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कलाकार म्हणून किंवा नेता म्हणून बोलत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या कार्यक्रमप्रसंगी शत्रुग्न सिन्हा म्हणाले की, रणजित देशमुख सगळ्यांचे प्रिय आहेच अगदी ते विरोधकांचेसुद्धा खूप प्रिय असल्याचे सांगत रणजित देशमुख यांच्या राजकीय वाटचालीविषयी आपले मत व्यक्त केले.तसेत यावेळी आशिष देशमुख यांच्या सोबत न्याय झाला पाहिजे ते चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वालाही राजकारणात वेगळी ओळख करुन दिले पाहिजे असे सांगत त्यांनी राजकीय मतंही व्यक्त केली.

काँग्रेस मोठ्या नेत्यांची पार्टी

काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी आणि काँग्रेसच्या वाटचालीविषयी काँग्रेस पार्टी ही मोठ्या नेत्यांची पार्टी आहे. या पार्टीत अनेक व्यक्तिमत्वं निर्माण झाली आहेत. या देशात काँग्रेसने अनेक मोठे कामं केली आहेत. काँग्रेसमुळेच मोठी क्रांती या देशात झाली असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाला किती मोठा इतिहास आहे हे ही त्यांनी सांगितले.

देशाचा विचार धरुनच कायम बोलत आलो

मी दुसऱ्या पक्षात होतो पण त्यावेळीही मी सरळ आणि साफ बोलत होतो. या आधी ज्या पक्षात होतो त्या पक्षातही मी देशाचा विचार धरुनच कायम बोलत आलो आहे. त्यामुळे देशाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी आपल्या पार्टीचंसुद्धा ऐकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

तुमचा मोठा विजय होणार…

नोट बंदी असो की मग जीएसटी मी त्यावर बोललो आहे आणि बोलत राहणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मला म्हणाल्या होत्या. तुम्ही बंगालमध्ये जा त्या ठिकाणी तुमचा मोठा विजय होणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणीही यावेळी त्यांनी सांगितल्या.

महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न

सध्याची भारतीय राजकारणातील परिस्थिती वेगळी आहे. महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न भेडसावत आहेत. आणि यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us