वडील शिक्षक, एकुलती एक मुलगी; तिच्या एका चुकीच्या निर्णयाने आईवडील ढसाढसा रडले

| Updated on: May 03, 2023 | 8:47 PM

गौरी ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी. तिचे वडील शिक्षक आहेत. तिची आई गृहिणी आहे. मुलीचे चांगले शिक्षण शिक्षण घ्यावे म्हणून तिच्या पालकांनी तिला नागपूरला पाठवले.

वडील शिक्षक, एकुलती एक मुलगी; तिच्या एका चुकीच्या निर्णयाने आईवडील ढसाढसा रडले
Follow us on

नागपूर : आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी विदर्भातील बहुतेक लोकं मुलांना नागपूरला शिकायला पाठवतात. नागपूर हे शिक्षणाचे हब झाले. नागपुरात बरेच चांगले कॉलेज असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. गौरी सुनील भावेकर ही २१ वर्षीय युवती. मूळची अमरावती जिल्ह्यातल्या धामनगाव रेल्वे तालुक्यातील लुनावतनगर येथील. गौरी ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी. तिचे वडील शिक्षक आहेत. तिची आई गृहिणी आहे. मुलीचे चांगले शिक्षण शिक्षण घ्यावे म्हणून तिच्या पालकांनी तिला नागपूरला पाठवले.

गौरी नागपुरात कॉम्प्युटर सायन्सच्या सेकंड इअरला होती. प्रियदर्शीनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये मैत्रिणींसोबत राहत होती. सेकंड इअरच्या थर्ड सेमिस्टरचा निकाल लागला. यात ती तीन विषयांत अनुत्तीर्ण झाली. तिच्यासोबत आणखी दोन मुली खोली क्रमांक २१३ ए मध्ये राहत होत्य. त्या दोघीही पास झाल्या. पण, गौरीचे तीन विषय राहिल्याने ती नैराश्यात होती.


गौरी रुममध्ये एकटीच होती

रविवारी सायंकाळची वेळी. रात्री आठ वाजताच्या दरम्यान गौरीच्या रुममेट दुसऱ्या खोलीत गेल्या होत्या. गौरी रुममध्ये एकटीच होती. त्यावेळी खोलीत तिने गळफास घेतला. मैत्रिणी परत आल्या तेव्हा हा प्रकार समोर आला. त्यांनी हॉस्टेलच्या वॉर्डनला कळवले. वॉर्डन अर्चना संदेश बुरबुटे यांनी प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

प्रतापनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश कुरसुंगे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवण्यात आला. घटनेची माहिती आईवडिलांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आई-वडिलांच्या अपेक्षा भंग

गौरीच्या आईवडिलांनी नागपुरातील मेडिकल गाठले. दुःखी अंतःकरणाने मुलीचा शेवटचा चेहरा बघीतला. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी मोठ्या लाडाने तिचे संगोपन केले होते. वडील शिक्षक असल्याने मुलीकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या.

आपली मुलगी पदवी प्राप्त केल्यानंतर आणखी उच्च शिक्षण घेईल. आपल्यापेक्षा मोठी होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण, गौरीचा मृतदेह त्यांच्या हाती पडला. यावेळी ते ढसाढसा रडले. मृतदेह घेऊन अमरावतीला परतले.