नागपुरातील ८० टक्के भिकारी गेले कुठं?; पोलिसांचे आदेश नेमके काय?

| Updated on: Mar 09, 2023 | 11:44 AM

नागपूर शहरात भिक मागणारे चौकाचौकात उभे असतात. याविरोधात नागरिकांकडून ओरड होत असते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पण, आता जी-२० च्या निमित्ताने शहरात भिकाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली.

नागपुरातील ८० टक्के भिकारी गेले कुठं?; पोलिसांचे आदेश नेमके काय?
Follow us on

नागपूर : G- 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी भिक मागण्यास बंदी घातलीय. भिक मागीतल्यास कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल होणार आहे. पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीनं नागपुरातील ८० टक्के भिकारी शहर सोडून गेलेत. शहरातील चौका-चौकात ऐरवी मोठ्या संख्येने भिकारी लहान मुलं खांद्यावर घेऊन भिक मागायचे. पण आता या चौकांमधून भिकारी अचानक गायब झालेय. नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरात एक हजार पेक्षा जास्त भिकारी वर्षानुवर्षे राहतात. पण पोलीस आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. शहरात ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत शहरातील रस्त्यावर भिक मागण्यास बंदीचे आदेश दिले. त्यानंतर नागपुरातील ८० टक्के भिकारी गायब झालेत. शहर सोडून गेलेत.

शहरातील भिकाऱ्यांविरोधात मोहीम

नागपूर शहरात भिक मागणारे चौकाचौकात उभे असतात. याविरोधात नागरिकांकडून ओरड होत असते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पण, आता जी-२० च्या निमित्ताने शहरात भिकाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली. भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. त्यामुळे शहरातील सुमारे ८० टक्के भिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

चौकात वाहनचालकांकडून वसूल करायचे पैसे

बरेचदा शहरातील चौकात भिकारी वाहनचालकांकडून पैसे घेत होते. विविध पद्धतीने त्रासही देत होते. अचानक वाहनाच्या समोर येऊन ठेपायचे. अशावेळी वाहनचालक अडचणीत सापडायचा. शिवाय वाहतुकीची कोंडीही होत होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

एक भिकारी दारुसाठी मागतो भिक

सीताबर्डी चौकातील एक भिकारी दारुसाठी भिक मागतो. काही भिकारी दारुची नशा करण्यासाठी पैसे मागायचे. पैसे मिळाले की, दारु पिऊन टुन्न राहायचे. भिकाऱ्यांच्या बंदोबस्ताची मागणी काही नागरिकांकडून होत होती. यावर जी-२० च्या निमित्ताने का होईना, कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळं शहरातील रस्त्यांवरील भिकाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. पण, आता यापैकी बरेच भिकारी शहरातून गायब झाले आहेत. कारवाईचा बडगा उभारल्याने घाबरले आहेत.