AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत बिरसा मुंडा ज्यांना आदिवासी क्रांतीसूर्य मानतात

अपनी धरती, अपना राज. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला.

कोण आहेत बिरसा मुंडा ज्यांना आदिवासी क्रांतीसूर्य मानतात
बिरसा मुंडा Image Credit source: tv 9
| Updated on: Nov 14, 2022 | 11:46 PM
Share

नागपूर : बिरसा मुंडा यांचा जन्म मुंडा कुटुंबात १५ नोव्हेंबर १८७५ साली झाला. बालपणी ते सुंदर बासरी वाजवित असतं. छत्तीसगड राज्यातल्या आदिवासी भागात बालपण गेलं. वडिलांनी त्यांना मिशन स्कूलमध्ये पाठविलं. शिक्षण घेतलं पण, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. इंग्रजांची नोकरी करावी, असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण, बिरसा यांनी शिक्षणाचा उपयोग आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी केला. आदिवासींचं जीवन अभ्यासलं. जंगलात अनेक दिवस काढले. आदिवासींमध्ये जनजागृती केली.

भारतीय संस्कृती, आयुर्वेद समजून घेतलं. औषधी विज्ञानात पारंगत झाले. रुग्णांची सेवा करू लागले. घर स्वच्छ ठेवा. खोटं बोलू नका. एकजूट राहा. निर्णय पंचायतकडून करा, असा संदेश त्यांनी आदिवासींना दिला.

इंग्रजांनी आदिवासींना बेदखल केले. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर अधिकार गाजविले. तेव्हा बिरसा यांनी आदिवासींना संघटित केलं. अपनी धरती, अपना राज. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला.

बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात १८९९ मध्ये सात हजार लोकं एकत्र आले. इंग्रज आणि आदिवासी यांच्यात डोम्बरी पहाडी येथे चकमक झाली. त्यात महिला, मुलं मारले गेले. त्यानंतर भूमिगत राहून बिरसा मुंडा काम करत होते. जंगल हेच त्यांच्यासाठी शिबिरस्थान होते.

काही दिवसांनी फितुरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. कैदेत असताना वयाच्या २५ व्या वर्षी ९ जून १९०० मध्ये बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला. इंग्रजांनी कैदेत असताना विष प्रयोग करून बिरसा यांना ठार केल्याचा आरोप केला जातोय.

देशभरात विशेषता बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, प. बंगाल या भागात बिरसा मुंडा यांना क्रांतीसूर्य मानलं जातं. १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी बांधव साजरी करतात.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.