AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan : महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण…; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही भाष्य केलं.

Prithviraj Chavan : महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण...; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण...; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 4:53 PM
Share

मुंबई: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महाविकास आघाडीला (mahavikas agahdi) कडू गोळीची उपमा दिली आहे. महाविकास आघाडी ही कडू गोळी आहे. पण भाजपला हटवायचे असेल तर ही कडू गोळी घ्यावी लागेल याची कल्पना होती म्हणून एकत्र आलो, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. दोन पक्षाचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत आहे. पण तीन पक्षाचं सरकार स्थापन करण्याचा पहिल्यांदा हा प्रयोग झाल्याने अडचणी होतातच, असंही त्यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकांवरही (corporation election) त्यांनी भाष्य केलं आहे. महापालिका निवडणुका एकत्र लढायच्या की नाही, हा राज्यपातळीवरचा निर्णय आहे. स्थानिक पातळीवर हे ठरवायचं आहे. महाविकास आघाडी केली तर भाजपाचा सफाया होईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यावर अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पालिकेत आघाडी एकत्रं येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही भाष्य केलं. याबाबत कोर्टात लढाई लढू. एखाद्या व्यक्तीने चुकीचे काम केले असेल तर नक्की खटला चालवा. पण तुम्हाला ते करायचं नाही. तुम्हाला फक्त मानहानी करायची आहे. आरोप सिद्ध करा ना? असं आव्हानच चव्हाण यांनी भाजपला दिलं. यावेळी त्यानी संघावरही भाष्य केलं. मोदी आज संघाचे काही ऐकतात का? त्यांचे काही चालतं असं मला वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मी अजिबात नाराज नाही

मुकुल वासनिक यांना परत महाराष्ट्रातून आणलं तर बरं होईल असं मला देखील वाटलं. मी नाराज आहे असं काही नाही. पण महाराष्ट्रासाठी आनंदी वातावरण होईल असं माझं मत होतं. मी नाराज अजिबात नाही. ही चर्चा संपलेली आहे, असं त्यांनी सांगितलं.

काय निष्पन्न होईल माहीत नाही

राज्यसभेसाठी 6 जागांसाठी 7 अर्ज आले आहेत. कोणाला एकाला पराभूत व्हावं लागेल. काय निष्पन्न होत आहे माहिती नाही. आमचे सगळे मत एकत्र राहतील, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी त्यांच्या पद्धतीने लढत आहेत

राहुल गांधी यांच्यावरील विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे साहेब देखील म्हणाले होते की मी पण त्यांना भेटू शकलो नाही. कोरोना काळात भेटलो नाही. ते आपल्या पद्धतीने लढत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देखील नेतृत्व करत आहेत. कोव्हिडमुळे काँग्रेस अध्यक्ष पद निवडायला वेळ लागला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.