मालेगावमध्ये सभा का घेतोय…? ; संजय राऊत यांनी कारण सांगितले..

| Updated on: Mar 26, 2023 | 8:06 PM

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहेत, कांद्याला भाव मिळत नाहीत. येथील कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे, पण आपल्याला बाजूच्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे.

मालेगावमध्ये सभा का घेतोय...? ; संजय राऊत यांनी कारण सांगितले..
Follow us on

मालेगाव/नाशिक : कोण आला रे कोण, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना ही शिवसेना कुठेही वाकलेली नाही, झुकेलेली नाही अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा समाचार घेतला. यावळी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत राज्याचे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, हे तुफान आता कोणी रोखू शकत नाही शिवसेना हे काय आहे ते पाहायचं असेल तर त्या निवडणूक आयोगाने मालेगावमध्ये एकदा इकडे येऊन पाहावं असा टोला त्यांनी निवडणूक आयोगाला लगावला आहे.

निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचं महाकाव्य निर्माण करून ठेवले आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी सांगितले की,  मोर बसेलेले हे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ही शिवसेना विधानसभेत पुन्हा भगवा फडकवेल आणि उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेतही त्यांनी सांगितले की, ही शिवसेना तुटलेली नाही, वाकलेली नसून सर्व धर्माचे नागरिक शिवेसेनेच्या पाठीशी उभी आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

खासदार संजय राऊत यांनी येथील आमदारांवर टीका करताना मालेगावमध्ये सभा का घेत आहोत तर मालेगावचा ढेकून चिरडण्यासाठी ही सभा घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासारखा आपल्यासारखा प्रमाणिक नेता आम्हाला मिळाला आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर संदेह केला जाऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहेत, कांद्याला भाव मिळत नाहीत. येथील कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे, पण आपल्याला बाजूच्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे.

गुलाबराव पाटलांना रस्त्यावर फेकायचा आहे, ज्यांनी गद्दारी केली त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.