AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?
| Edited By: | Updated on: Jul 25, 2019 | 7:27 AM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु झाल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

वैभव पिचड यांचे वडील मधुकर पिचड हे अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. विशेष म्हणजे मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अनेकदा त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मधुकर पिचड यांचाच मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे.

वैभव पिचड यांची मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया कळू शकली नाही. पण वैभव पिचड हे शिवसेना किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा त्यांच्या मतदारसंघातही गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.

मधुकर पिचड यांनी अकोल्यातून मुलाला उमेदवारी दिली होती. वैभव पिचड सध्या बंदीस्त कालव्यांसाठी आंदोलन करत आहेत. निळवंडेच्या कालव्यांना वैभव पिचड यांचा विरोध आहे.

उघड्या कालव्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनांसाठी मतदारसंघात सक्रिय असणारे वैभव पिचड आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत गेलाय.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शिवबंधन बांधलं होतं. आणखी अनेक आमदार भाजपात येणार असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून कायम केला जातोय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.