अनुसूची जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणार, आता जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन, आनंदराज आंबेडकर यांची घोषणा

मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. मात्र, आता जिल्ह्याजिल्ह्यात अशी आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अनुसूची जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणार, आता जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन, आनंदराज आंबेडकर यांची घोषणा
anandraj ambedkar
| Updated on: Jun 30, 2026 | 7:09 PM

अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाला सर्वाच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे. या विरोधात आता अनुसूचित जातींच्या आरक्षणाला झळ बसणार असल्याने त्याला विरोध करण्यासाठी आज मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. या आंदोलनामुळे सरकारला जाग यायला हवी यासाठी जिल्ह्या – जिल्ह्यात अशी आंदोलने होतील असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याने मुंबईतील आंदोलन मागे घेत असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

58 -59 जातींना अंगावर घेऊ नका

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी आज सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला सोबत आहेत. उद्या किंवा परवा ही बैठक होईल. त्यामुळे अर्धी लढाई आपण जिंकलेलो आहोत. सरकार आश्वासन देतंय, पण जिल्हा जिल्ह्यात ही आंदोलने झाली पाहिजेत 59 जाती आता शांत बसायला तयार नाहीत, आज आमच्यासोबत सगळा समाज आहे.आम्ही सांगितलं की तुम्ही या 58 -59 जातींना अंगावर घेऊ नका, हे उपवर्गीकरण आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही असेही आंबेडकर म्हणाले.

आज आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याची दखल संपूर्ण विधीमंडळाने घेतली आहे आणि याची झळ लागलेली आहे. आता आपण हा लढा थांबवायचा नाही. प्रत्येक जिल्ह्यात ही आंदोलन करायची असेही यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले. आपण मुंबईमध्ये एकत्रित आलात आता. जिल्ह्या- जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरु ठेवा आणि हे सगळं आता आपल्याला एकत्रित करायचे आहे आणि ही एकी टिकवण्याचे काम आपले आहे.आपल्याला निधी आणि काही ठिकाणी आरक्षण मिळत नाही. त्यासाठी आता लढायचं आहे आणि पुढील काम करायचे आहे. मुंबईतील आंदोलन संपवत आहोत. या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचे धन्यवाद असेही ते म्हणाले.

Follow Us