Nandurbar | धक्कादायक! नंदुरबार जिल्हात सहा महिन्यात 86 नवजात बालकं दगावली, 10 मातांचाही प्रसुतीच्या वेळी मृत्यू…

| Updated on: Jul 07, 2022 | 11:25 AM

जिल्ह्यातील माता मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब असून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकूणच ही आकडेवारी जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना दगावलेल्या माता आणि नवजात बालकांची आहे. शासनाने बाळंतपणातील मृत्यू रोखण्यासाठी अनेक योजना लागू केल्यात आहेत.

Nandurbar | धक्कादायक! नंदुरबार जिल्हात सहा महिन्यात 86 नवजात बालकं दगावली, 10 मातांचाही प्रसुतीच्या वेळी मृत्यू...
Image Credit source: tv9
Follow us on

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या 10 मातांचा प्रसूतीच्या वेळी मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून पुढे आले. तर 86 नवजात बालकांचा मृत्यू झाला असून ही उत्तर महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक संख्या आहे. एकूणच नंदुरबार जिल्हा कुपोषण आणि माता मृत्यूच्या नावाने ओळखला जात असला तरी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या वतीने कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार ही समोर येत आहेत. मात्र शासनाच्या विविध योजना असतानाही माता मृत्यू (Death) होतात कसे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माता मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिकच

जिल्ह्यातील माता मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब असून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकूणच ही आकडेवारी जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना दगावलेल्या माता आणि नवजात बालकांची आहे. शासनाने बाळंतपणातील मृत्यू रोखण्यासाठी अनेक योजना लागू केल्यात आहेत. मात्र, असे असतानाही नंदुरबार जिह्यात प्रसूतीच्या वेळीचे मृत्यू रोखण्यात प्रशासनान यश मिळाले नाहीयं.

हे सुद्धा वाचा

जिल्हा प्रशासनाला मृत्यू रोखण्यात अपयश

जिल्ह्यात अजूनही घरी प्रसूती करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची कुठलीही नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे माता आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असू शकण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच काय तर येणारी आकडेवारी ही फक्त दवाखान्यात नोंद होणारी आहे. पण घरी प्रसूती करण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही.