AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र इंगोले ! एक लाख मजुरांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणारा अवलिया

'गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा', या राष्ट्रसंत तुकडोजी महारांच्या ग्रामगीतेतील ओळी गावचे महत्त्व विशद करतात.

रवींद्र इंगोले ! एक लाख मजुरांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणारा अवलिया
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंगोले
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 15, 2021 | 3:10 PM
Share

वाशिम : ‘गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा’, या राष्ट्रसंत तुकडोजी महारांच्या ग्रामगीतेतील ओळी गावचे महत्त्व विशद करतात. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून देशातील खेडेगाव समृद्ध होऊन तेथील कष्टकरी मजुरवर्गाचे जीवनमान सुकर व्हावे याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील मजुरांना होऊन त्यांचे स्थलांतर थांबून गावातच त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता एक अवलिया निस्वार्थपणे झटत आहे. आतापर्यंत ‘जागर मनरेगाचा’ ही संकल्पना घेऊन 237 गावात शिवारफेरी काढून तब्बल एक लाख मजुरांना त्यांच्या गावातच हक्काचा रोजगार या ध्येयवेड्या तरुणाने उपलब्ध करून दिला आहे.

वाशिम जिल्ह्यातील जलदुत रवींद्र इंगोले यांचा स्तुत्य उपक्रम

पूर्वीच्या रोजगार हमी योजनेत आवश्यकते बदल करून 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नव्याने कार्यान्वित करण्यात आली. गावातील कष्टकरी मजूरवर्गाला स्थलांतर न करता त्यांच्या गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गावाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या योजनेची माहीत मजुरांना व्हावी, त्यांची रोजगारा करीता होणारी भटकंती थांबावी, याकरीता वाशिम जिल्ह्यातील जलदुत रवींद्र इंगोले हा तरुण कुठल्याही मानधना शिवाय निस्वार्थपणे झटत आहे.

पथनाट्यांमधून जनजागृती

मनरेगा ही योजना सहज सोप्या माध्यमातून मजुरांना समजावी याकरीता रवींद्र इंगोले यांनी ‘जागर मनरेगाचा, हे पथनाट्य तयार केले आहे. याद्वारे वातावरण निर्मिती, गावाचा विकास आराखडा तयार करणे, जॉब कार्ड, काम मागणी अर्ज, मनरेगा मजुरांचे अधिकार, मजुरांना कामगार कल्याण विभागामार्फत मिळणारे फायदे या बाबी ते खेळाच्या माध्यमातून मजुरांना समजावून सांगतात. याकरीता त्यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील 237 गावात शिवारफेरी काढली आहे. त्यांनी या उपक्रमातून एक लाख मजुरांना त्यांच्या गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

‘ओस पडत चाललेल्या खेड्यांना गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न’

मनरेगा योजनेअंतर्गत गावतालाव, वृक्ष लागवड, भूमिगत बंधारे, जलाशयाचे खोलीकरण यांसारखी कामे करणे शक्य असून यासर्व कामांवर गावातील मजुरांना वर्षभर सहज रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कष्टकऱ्यांच्या उपजीविकेचा पाया मजबूत करून सामाजिक सहभागाची सकारात्मकता वाढविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे ओस पडत चाललेल्या खेड्यांना गतवैभव प्राप्त होऊन मजुरांच्या जीवनात समृद्धी यावी हा आपला प्रयत्न असल्याचे रवींद्र इंगोले सांगतात (social activist Ravindra Ingole who work for rural employment in Washim).

हेही वाचा : Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी निकाल!

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका