AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला, मुलींना उचलून नेतात, अत्याचारांमुळे पाकिस्तान सोडून भारतात आलो – पाकिस्तानी नागरिकांनी मांडली कैफियत

भारतात राहणारे पाकिस्तानी हा मुद्दा चर्चेत आला असून जळगावध्येही अनेक पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे. लाँग टर्म व्हिसा घेऊन ते भारतात रहात आहेत. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. तिथे कशी परिस्थिती हती, भीती वाटायची असे सांगत अनेक नागरिकांनी आपबिती कथन केली.

महिला, मुलींना उचलून नेतात, अत्याचारांमुळे पाकिस्तान सोडून भारतात आलो - पाकिस्तानी नागरिकांनी मांडली कैफियत
आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व द्या..Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 26, 2025 | 9:28 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतलादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला. पर्यटनाचा, सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या लोकांना दहशतवाद्यांवनी त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यादेखत गोळ्या झाडून ठार केलं. या हल्ल्यानंत संपूर्ण देशात क्रोधाचं , संतापाचं वातावरण असून दहशतवाद्यांची नांगी ठेता, त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानालही धडा शिकवा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं ुचलंत पाकिस्तानची कोंडी करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. सिंधू कराराला स्थगिती, भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

48 तासांत पाकिस्तांनी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले असून अनेक जण पाकिस्तानात परतत आहेत. भारतात राहणारे पाकिस्तानी हा मुद्दा चर्चेत आला असून जळगावध्येही अनेक पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे. लाँग टर्म व्हिसा घेऊन ते भारतात रहात आहेत. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व मिळावं, अशी त्यांची मागणी असून कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे. पाकिस्तानात घडणाऱ्या घटना, अत्याचार, वाटणारी भीती या सर्वांना कंटाळून अनेक पाकिस्तानी नागिरकांनी भारतात येऊन स्थायिक राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील अनेक महिलांनी त्यांची कैफियत मांडली आहे.

रोजच्या जगण्याचा संघर्ष

आम्ही पाकिस्तानाता 50 वर्ष राहिलोय, आता दोन वर्षांपासून इथे भारतात, जळगावात येऊन राहतोय. तिकडे परिस्थिती ठीक नव्हती, गॅस नाही, पाणी, लाईट नाही, काहीच नव्हतं , खूप त्रास व्हायचा. त्याउप्पर म्हणजे तिथे राहताना भीती वाटायची. तिथे आम्ही कामधंदा करायचो, पण संध्याकाळी 5 वाजता दुकान बंद करायचो, घाबरून घाबरू रहायचो, असा अनुभव एका गृहस्थांनी सांगितला.

रोजच्या अत्याचाराला कंटाळून आम्ही पाकिस्तान सोडलं

आम्ही जळगावात 3-4 वर्षांपासून राहतोय. तिथे( पाकिस्तान) वातावरण खूप खराब होतं, बाहेर पडणं देखील मुश्कील होतं , खूप भीती वाटायची असं एका महिलेने सांगितलं. पण इथे चांगलं वाटतं असं एका महिलेने सांगितलं.

महिला मुली पाकिस्तानात सुरक्षित नाहीत , बाहेर फिरणं तर सोडाच दिवसभर घराबाहेर पडता येत नव्हतं, मुलांना मुलींना उचलून घेऊन जातात, अशा दडपणाखाली भीतीने पाकिस्तानात जगत होतो असं आणखी एका महिलेने आणि इतर नागरिकांनी बोलताना सांगितलं. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचे नागरिकत्व द्यावं, आमचे नातेवाईक तसे कुटुंब जे पाकिस्तानात आहे त्यांना सुद्धा भारतात घेऊन यावं, अशी मागणीही अनेक कुटुंबांनी केली आहे

चार ते पाच दिवसांपूर्वीच आमचे कुटुंबीय नूरी व्हिजा घेऊन पाकिस्तानात गेले, त्यातच पहलगाम येथील घटना घडल्यामुळे ते आता पाकिस्तानात अडकले आहेत, त्यांना पुन्हा भारतात येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या बांधवांनी केली आहे. भारतात आम्ही , आमच्या महिला सुरक्षित आहोत जळगावात राहताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा त्या नरकात (पाकीस्तानात) जायचं नाही , अशा भावना या नागरिकांनी बोलून दाखवल्या.

Follow Us
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन