AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, राज्यातील 3500 गावे संपर्क क्षेत्राबाहेर, गावांमध्ये नाही ‘या’ सुविधा

Pune News : राज्यात नुकतीच इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. त्यावेळी या गावात संपर्क सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मदत आणि बचावकार्यावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर राज्यात हजारो गावे अशी असल्याची माहिती समोर आलीय.

धक्कादायक, राज्यातील 3500 गावे संपर्क क्षेत्राबाहेर, गावांमध्ये नाही 'या' सुविधा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 25, 2023 | 12:43 PM
Share

प्रदीप कापसे, पुणे | 25 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीत १९ जुलै रोजी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. अजूनही शेकडो जणांचा शोध लागला नाही. शासनाने चार दिवसांनी शोध कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला. मुंबईपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शाळवाडीत मोबाईलवरून संपर्क साधणे कठीण आहे. दुर्गम भागात असलेल्या या वाडीवर दैनंदिन दळणवळणाची साधनेही नाहीत. या पार्श्वभूमीर आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इर्शाळवाडीसारखे अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी संपर्क साधता येत नाही.

3500 गावं संपर्क क्षेत्राबाहेर

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील 3500 गावे संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. दूरसंचार विभागाकडूनच ही माहिती मिळाली आहे. अनेक गावांत संपर्काची अजूनही सुविधा नाही. इर्शाळवाडीच्या घटनेनंतर संपर्क क्षेत्राबाहेर असलेल्या गावांचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. संपर्क होत नसलेल्या गावांमध्ये कोकण आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागातील गावांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी अनेक पायाभूत सुविधा तर लांब पण संपर्काचे साधन नाही. इंटरनेटची सुविधा नाही. यामुळे संपर्क होत नाही.

राज्यात मोठी संख्या तर देशात काय?

इर्शाळवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जाऊन आले. या ठिकाणी मोबाईलने संपर्क होत नसल्याचे त्यांनी मान्य केली. मग इर्शाळवाडीसारखे हजारो गावे राज्यात आहे. त्या ठिकाणी आतातरी संपर्क साधणे उभी केली गेली पाहिजे. यामुळे प्रशासन पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी संपर्क साधू शकतो. राज्यात ही संख्या मोठी असताना देशाचा विचार केल्यास त्यात मोठी भर पडेल. यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सर्व गावांपर्यंत सुविधा पोहचल्या पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये एकीकडे 5G ची सुविधा सुरु झाली आहे. दुसरीकडे अनेक गावांमध्ये संपर्क होऊ शकत नाही. शहर आणि गावांमधील पायाभूत सुविधांचे हे आंतर कसे कमी होणार? हा प्रश्न सामान्यांना आहे.

Follow Us
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले