AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस म्हणत होते, अजित पवार चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, मग पहाटेच का केलं किसिंग? कुणी केलाय सवाल?

अजितदादांच्या न झालेल्या बंडावरून सोशल मीडियावर धमाल प्रतिक्रिया येत आहेत. तर राजकारणावर बोचरी टीका करणारेही ही संधी सोडत नाहीयेत.

फडणवीस म्हणत होते, अजित पवार चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, मग पहाटेच का केलं किसिंग? कुणी केलाय सवाल?
2019 पहाटेच्या शपथविधीचे छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2023 | 12:54 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : अजित दादांनी (Ajit Pawar) भाजपच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल मागे घेतलं खरं. पण या सगळ्या शक्यता वर्तवणाऱ्यांवरही ते भयंकर चिडले. खुद्द संजय राऊतांनाही (Sanjay Raut) सोडलं नाही. राजकीय जाणकार मात्र अजूनही आपल्या आडाख्यांवर ठाम आहेत. तर राजकारणातील अनेक नेते मंडळीदेखील नव-नवीन भाकितं वर्तवत आहेत. पुण्यातूनही एक अशीच टिप्पणी आली आहे. राजकारणातील सद्यस्थितीवर बोचरी टीका करणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सध्याच्या परिस्थितीवर थेट भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील शीतयुद्धावरच त्यांनी बोट ठेवलंय. जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना तुरुंगात जावं लागू शकतं, अशी शक्यता देवेंद्र फडणवी यांनी व्यक्त केली होती. मग अचानक पहाटेचा शपथविधी कसा झाला, असा सवाल बिचुकले यांनी केलाय, तेसुद्धा त्यांच्या खास स्टाइलमध्ये..

काय म्हणाले बिचुकले?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्यावर जलसिंचन घोटाळ्यावरून जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा असं काय घडलं, यावरून बिचुकले यांनी सवाल केला. ते म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस म्हणत होते जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग मग पहाटे का केलं किसिंग, असा सवाल बिचुकले यांनी केलाय.

लवकरच पक्ष काढणार..

अभिजित बिचुकले यांनी नुकताच कसबा पेठेतील विधानसभा पोट निवडणुकीत सहभाग घेतला होता. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या निवडणुकीत बिचुकले यांच्या उपस्थितीने रंगत आणली होती. बिचुकले यांना दोन अंकी मतदानाचा आकडाही गाठता आला नाही. मात्र मी आता नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 2024 मध्ये माझा पक्ष 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आणि 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, असा दावाही बिचुकले यांनी केलाय.

अजित पवारांवर थेट निशाणा…

अजित पवार यांच्या मनात महिलांबद्दल किती सन्मान आहे, हे त्यांच्या एका वक्तव्यावरूनच दिसतं. नारायण राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी राणेंना एका महिलेनं पाडलं.. बाईनं.. बाईनं.. असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून अभिजित बिचुकले यांनी ही टीका केली.

पहिली महिला मुख्यमंत्री..

माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, अशी मागणी पुन्हा एकदा अभिजित बिचुकले यांनी केली. मुख्यमंत्र्यांना त्यांना याआधी तसं पत्रही लिहिलं होतं. ती राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री असेल, असंही बिचुकले म्हणाले.

आता नवी मागणी काय?

तर अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भवनाला छत्रुती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी नवी मागणी बिचुकले यांनी केली आहे. या आशयाचं एक पत्र नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दिलंय.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.