जमिनीवरचा लढा दिला, आता कायदेशीर लढाई, चित्रा वाघ या संजय राठोड प्रकरणी नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Jan 09, 2023 | 6:29 PM

आता न्यायालयीन लढाई चालू आहे. न्यायालयावर विश्वास आहे. त्यात आम्हाला नक्की विजय मिळेल.

जमिनीवरचा लढा दिला, आता कायदेशीर लढाई, चित्रा वाघ या संजय राठोड प्रकरणी नेमकं काय म्हणाल्या?
चित्रा वाघ
Follow us on

उस्मानाबाद : येथे भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड यांचा जमिनीवरचा जेवढा लढा द्यायचा तेवढा आम्ही दिलेला आहे. आता कायदेशीर लढाई सुरू आहे. चित्रा किशोर वाघ वर्सेस महाराष्ट्र सरकार अशी मी पीआयएल दाखल केली आहे. आता न्यायालयीन लढाई चालू आहे. न्यायालयावर विश्वास आहे. त्यात आम्हाला नक्की विजय मिळेल.

समाजस्वास्थ्याच्या विषयावर राजकारण करू नये, हे मी शिकलेली आहे. मी राष्ट्रवादीमध्ये २० वर्षे होती. शरद पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत, अशा नागड्या उघड्यांचं समर्थन करणार नाहीत. हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलं की, आरोप प्रत्यारोप थांबवा, अशी मागणी केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.

आरोप-प्रत्यारोप आमच्याकडून चाललेले नाहीत. त्यांनी प्रश्न विचारले. त्याची उत्तर देणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. त्यांनी नोटीस पाठविली. आम्ही महिला आयोगाचा सन्मान करतो. चेअरपर्सन म्हणून आयोग नव्हे. आयोगाची एक गरीमा आहे. त्याचा सन्मान लावतो.

नंगानाच बंद करा, अशी माझी मागणी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात, वेळ वाया घालवायचा नाही. मी आक्षेप घेतला म्हणून मला नोटीस पाठविली. जी उघडीनागडी फिरते तिला नोटीस पाठविली नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

रोखठोक भूमिका आवडली ती अजित पवार यांची. त्यांनी म्हंटलं आम्ही महिलांना संधी देतो. त्याचं सोन करायचं की, राख करायचं हे त्यांनी ठरवायचं. राख होत असलेली अजित पवार यांना दिसली असेल, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.