AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Temperature : पुणेकरांना आणखी चार दिवस ‘ताप’! उष्णतेची लाट कायम तर विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

महाराष्ट्रात 11 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Pune Temperature : पुणेकरांना आणखी चार दिवस 'ताप'! उष्णतेची लाट कायम तर विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 09, 2022 | 12:52 PM
Share

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणेकरांना उन्हाच्या चटक्याने (Heat) हैराण केले आहे. त्यातच आता आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुढचे चार दिवस हा उष्मा कायम राहणार आहे. वेधशाळेनेच याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र उकाड्याने त्रस्त झाला असताना हवामान विभागाने (IMD) ही ताप देणारी माहिती दिली आहे. विदर्भासह काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशाराही हवामानशास्त्र विभागाने दिला. विदर्भातील 7 जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात रविवारी सकाळी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान बेटाजवळ कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती शुक्रवारी झाली. शनिवारी त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले.

चक्रीवादळाचा तडाखा

याचे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्ट्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. हे वादळ सध्या पोर्ट ब्लेअरपासून 300 कि.मी., आंध्र प्रदेशपासून 1,270 कि.मी., तर ओडिशा किनारपट्टीपासून 1,300 कि.मी. अंतरावर घोंघावत आहे. अवघ्या 48 तासांत ते आंध्र व ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे या भागात 115 ते 204 मी. मी. पावसाचा अंदाज आहे.

11 मेपर्यंत उष्णतेची लाट

समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांसह सामान्य नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र 11 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर