AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना यश आलं”; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले…

एमपीएसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना यश आलं; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 23, 2023 | 7:54 PM
Share

मुंबईः राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारणही ढवळून निघाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यावर तोडगा काढण्याचे अश्वासन दिले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती.

त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आयोगाला कळवल्या जातील असा शब्दही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली.

त्यामुळे आता उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचे आभारही मानण्यात आले होते.

एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन करत आयोगाने आता अभ्यास करण्यासाठी वेळ दिला असल्याचे सांगितले.

परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे विद्यार्थ्यांना यश आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आयोगालाही धन्यवाद दिले आहेत.

एमपीएसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात असलेले शिंदे फडणवीस सरकार हे लोकांच्या भावना समजून घेत असते. आमचे सरकार ज्या प्रमाणे बोलत असते,त्या प्रमाणे निर्णय घेत असते असंही त्यांनी यावेळी घेतले. आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी वेळ दिला गेला आहे.

त्यामुळे या निर्णयाचे सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासक्रमाचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळात घेतला गेला होता, मात्र आम्ही विद्यार्थ्यांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...