AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, कोणत्या जिल्ह्यास दिला अलर्ट

Rain Update | राज्यात मान्सूनचा हंगाम संपला आहे. आता परतीचा पाऊस सुरु होणार आहे. राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाने पुढील चार दिवस पाऊस असणार असल्याचे म्हटले आहे.

Rain Update | राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, कोणत्या जिल्ह्यास दिला अलर्ट
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 01, 2023 | 9:16 AM
Share

पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम संपला आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. यंदा राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी अद्याप गाठली नाही. सप्टेंबर महिन्यात सुरु असलेला पाऊस ऑक्टोंबरच्या सुरुवातीला कायम आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.

काय आहे पावसाचा अंदाज

पुणे परिसरात रविवारी दिवसभर पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असणार आहे. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराडमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस असणार आहे. कोकणातही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस असणार आहे.

पुणे परिसरातील धरणे भरली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97% म्हणजेच 28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे परिसरातील टेमघर वगळता इतर सर्व धरणे भरले आहेत. पुणे परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पुणे शहर आणि घाट परिसरात चांगला पावासाची शक्यता व्यक्त केली आहे.

  • खडकवासला: १०० टक्के पाणीसाठा
  • पानशेत: १०० टक्के पाणीसाठा
  • वरसगाव: १०० टक्के पाणीसाठा
  • टेमघर: ७९.२१ टक्के पाणीसाठा

परतीचा पाऊस भात पिकांसाठी लाभदायक

मावळ तालुक्यात पडत असलेला परतीचा पाऊस हा भातपिकांसाठी पोषक आहे. सध्या इंद्रायणी भात पिके जोमात आले आहे. सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाला संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. परंतु ज्या ठिकाणी पावसाचे जास्त पाणी साठत असेल त्या ठिकाणी सांडव्यातून पाणी बाहेर काढावे, अशी सूचना मावळ कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी केली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.