AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज

Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात अपडेट माहिती दिली आहे. मान्सूनची प्रगती कुठपर्यंत आलीय अन् त्यानंतर राज्यात मान्सून कधी पोहचणार? हे हवामान विभागाने सांगितलंय.

Monsoon Update : मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 25, 2023 | 10:29 AM
Share

पुणे : मे महिन्यात तापमान सर्वत्र वाढले. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंशांचा वर पारा गाठला आहे. अनेक ठिकाणी कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे. त्याचवेळी राज्यात विदर्भात अवकाळ पाऊस आला आहे. उन्हामुळे जंगलातील वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यामुळे आता मान्सून कधी येणार? याची वाट सर्वच जणांकडून पाहिली जात आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

कुठे आहे मान्सून

मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला आहे. त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

चार दिवस उशीर होणार

विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे.  मान्सूनचे आगमन चार दिवस उशीराने होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून आता 4 जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान येण्याची शक्यता आहे.

स्कायमेट अन् आयएमडीचा वेगवेगळा अंदाज

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचा मे अखेरपर्यंत आणखी एक अंदाज येणार आहे. त्यात यंदाच्या पावसाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

मे महिन्यात धरणाचा साठा वाढला

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विदर्भात मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. यामुळे अमरावती जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी हतनूर धरणाच्या जलसाठ्यात गेल्या चार दिवसांत ३.२५ दलघमी वाढ झाली. हतनूरच्या इतिहासात पहिल्यांदा मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जलसाठा घटण्याऐवजी सलग दोन वेळा वाढ झाली. यामुळे पाऊस लांबला तरी धरणातून पाणीपुरवठा अवलंबून असलेली ११० गावे, शहरे व औद्योगिक प्रकल्पांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच पंधरा दिवस जास्तीचा दिलासा मिळेल.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत