Vasant More: हिमंत असेल तर महापौर जनतेतून निवडा- मनसे नगरसेवक वसंत मोरे
त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमधूनच नगराध्यक्ष, सरपंच निवडीची चर्चा रंगली आहे. त्यांनतर वसंत मोरे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा सरकारला आव्हान करत थेट केले आहे. राज्य सरकार लवकर थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष या निवडी प्रक्रियेमुळे स्थिरता आणण्यासाठी महत्त्वाचा आहे, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
पुणे – ‘हिमंत असेल तर महापौर जनतेतून निवडा कितीही ताकद लावा. पुण्याचा महापौरही मनसेचाच होणार असा विश्वासही त्यांनी मनसे (MNS)नगरसेवक वसंत मोरे(Vasant More) व्यक्त केला आहे. अस ऐकतोय की प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल असे ट्विट मनसे अध्यक्ष वंसत मोरे यांनी केलं आहे. हिंदुत्ववादी सरकार (Hindutvawadi sarkar)आहे त्यामुळे मशिदीवरील कारवाईसंदर्भात कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार का? हे पहावं लागेल. सरकार बदलल्यामुळे आता प्रभाग रचना बदलणार हे निश्चित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकार बदलले. असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल …#पुणे
हे सुद्धा वाचा— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 7, 2022
यांनी केली मागणी
देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री असताना नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेटसर्वसामान्य जनतेतून निवडून यावा असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 2019 मध्ये राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या निर्णयात बदल केला आहे. मात्र नुकतीच राज्यात सत्ता स्थापना केलेल्या भाजप – शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी ही स्थगिती मिळालेल्या या निर्णय पुन्हा लागू करा अशी मागणी चंदशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमधूनच नगराध्यक्ष, सरपंच निवडीची चर्चा रंगली आहे. त्यांनतर वसंत मोरे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा सरकारला आव्हान करत थेट केले आहे. राज्य सरकार लवकर थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष या निवडी प्रक्रियेमुळे स्थिरता आणण्यासाठी महत्त्वाचा आहे, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.