Ketan Agarwal Case: धक्कादायक माहिती समोर! अग्रवाल-गोयल कुटुंबात नेमकं काय घडलं होतं? 20 वर्षांच्या सियाला…

Ketan Agarwal Case: राज्यात केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणातील मु्ख्य आरोपी सिया गोयल ही 20 वर्षांची आहे. तिचे आणि केतनचे लग्न कसे ठरले? सियाने लग्नाला होकार का दिला? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ketan Agarwal Case: धक्कादायक माहिती समोर! अग्रवाल-गोयल कुटुंबात नेमकं काय घडलं होतं? 20 वर्षांच्या सियाला...
केतन अग्रवाल
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 24, 2026 | 3:40 PM

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची धकलून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. केतनची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलनेच केल्याचे समोर आले आहे. सियाने बॉयफ्रेंडसोबत मिळून भयानक कट रचला आणि केतनला किल्ल्यावरुन धक्का दिला. उंचावरुन खाली कोसळल्यामुळे केतनचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनच्या वडिलांनी सिया प्रवीण बसेसर गोयल विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अग्रवाल कुटुंबाने सुरुवातीला गोयल कुटुंबाशी सोयरीक नाकारली होती, अशी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

ओळख कशी झाली?

केतन विशाल अग्रवाल आणि सिया गोयल यांचे नाते कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका समाजातील लग्नसमारंभात नातेवाईकांच्या मध्यस्थीने झाले. त्या वेळी दोघांच्या लग्नाचा विषय प्रथमच चर्चेला आला. सियाचे वय केवळ २० वर्षे असल्याने अग्रवाल कुटुंबीयांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र गोयल कुटुंबीयांच्या सततच्या आग्रहामुळे आणि हट्टामुळे ते शेवटी तयार झाले. त्यानंतर दोघांच्या लग्नाची बोलणी झाली आणि १९ फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न ठरले होते आणि त्यासाठी हॉटेल किंवा हॉलची पहाणीही सुरू झाली होती.

साखरपुड्यानंतर वाढली जवळीक

साखरपुड्यानंतर गोयल कुटुंबीय अग्रवाल यांच्या घरी वारंवार येऊ लागले. सियाही अगरवाल कुटुंबासोबत कौटुंबिक सहलींना जाऊ लागली. केतनचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले, “आम्ही सुरुवातीपासून तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. आम्हाला कधीही कसलीही शंका आली नव्हती.”

सिया-चेतनचा प्लॅन

सिया गोयलला केतनशी होणारे लग्न अजिबात मान्य नव्हते. ती चेतन चौधरीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. केतनशी लग्न हे त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोघेही त्रस्त होते. शेवटी त्यांनी केतनला मार्गातून दूर करण्याची क्रूर योजना आखली. लग्न ठरल्यानंतर सिया केतनला वारंवार फोन करून फिरायला जाण्याची विनवणी करायची. होणाऱ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी केतन तिच्या प्रत्येक हट्टाला होकार देत असे. सिया विशेषतः लोहगड किल्ल्यावर फिरायचा हट्ट धरायची. त्यामुळे दोघे यापूर्वी दोनदा लोहगडावर फिरायला गेले होते.

Follow Us