AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी म्हणतोय आता हेलिकॉप्टरच खरेदी करतो, पण शासनाकडे करतोय ही मागणी

Pune News : शासनाकडून शेतकऱ्यांना विविध गोष्टींसाठी अनुदान दिले जाते. शेती अवजारापासून ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान दिले जाते. आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने शेतीसाठी हेलिकॉप्टर खरेदीसाठी अनुदान मागितले आहे.

शेतकरी म्हणतोय आता हेलिकॉप्टरच खरेदी करतो, पण शासनाकडे करतोय ही मागणी
helicopterImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Jul 25, 2023 | 11:02 AM
Share

पुणे | 25 जुलै 2023 : भारत कृषीप्रधान देश आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना शासनाकडून राबवल्या जातात. शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याची सरकारची जबाबदारी असते. परंतु सरकारकडून वर्षानुवर्षे पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात नाही. या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी महिलेने नवीन फंडा अवलंबला आहे. शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे.

काय आहे प्रकार

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे येथील शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांचे शेत आहे. परंतु त्यांच्या शेतापर्यंत रस्ता नाही. हा रस्ता तयार करण्याची विनंती करणारा अर्ज त्यांनी दिला होता. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळाची जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनपर्यंत अधिकारी पाहणी करण्यासाठी आले नाही. त्यामुळे रस्ता तयार होणे लांबच आहे.

लताबाई यांनी अनेकवेळा केली चर्चा

लताबाई हिंगे यांनी अनेकवेळा तहसीलदरांचे आदेश घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेट दिला. त्यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यानंतरही एकही जण रस्ता पाहण्यासाठी आला नाही. यामुळे हेलिकॉप्टर खरेदी केल्यास रस्त्याने न जात सरळ हेलिकॉप्टरने शेतात जात येणार आहे.

रस्ताच नसल्याने अनेक अडचणी

लताबाई हिंगे यांच्या शेतापर्यंत रस्ता नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. रोज शेतात जाताना बिकट प्रवास करावा लागतो. शेतमाल आण्यासाठी अनेक आव्हानांना समोरे जावे लागते. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी करणार अर्ज त्यांनी शिरूर येथील तहसीलदारांना दिला आहे. अधिकाऱ्यांना तहलीदारांकडून आदेश मिळाल्यानंतर त्याचे पालन होत नसल्याने लताबाई यांनी हा निर्णय घेतला आहे.

लताबाई हिंगे यांनी केलेल्या या मागणीवर तहसीलदार कार्यालयाकडून काय उत्तर येते? हे आता पाहावे लागणार आहे. या प्रकाराची चर्चा परिसरात सुरु झाली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.