AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी नितीन राऊतांनी शब्द पाळावा, मग ऊर्जा खाते सोडावे, पुण्यात आंदोलन

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आधी वाढीव वीजबिलाबाबत दिलेला शब्द पाळावा, त्यानंतर त्यांनी उर्जा खाते सोडावे अशी मागणी पुण्यात करण्यात आली. (Pune protest electricity bill Nitin Raut)

आधी नितीन राऊतांनी शब्द पाळावा, मग ऊर्जा खाते सोडावे, पुण्यात आंदोलन
आंदोलक
| Updated on: Feb 10, 2021 | 12:21 PM
Share

पुणे : उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin  Raut) यांनी आधी वाढीव वीजबिलाबाबत दिलेला शब्द पाळावा, त्यानंतर त्यांनी उर्जा खाते सोडावे अशी आक्रमक मागणी पुण्यात करण्यात आली. त्यासाठी पुण्यात दुकानदार व्यापारी असोसिएशनतर्फे वाघोली येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनी वाढीव विजबिलाच्या मुद्द्यावुरून सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. तसेच आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत राऊतांनी उर्जामंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. (Pune protest against electricity bill, demands resignation of Nitin Raut)

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन सरकार सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. वीजबिलामुळे भाजप, मनसे तसेच इतर पक्षांनी सरकारला वेळोवेळी घेरले आहे. या पक्षांकडून वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे काही संघटनासुद्धा याच मुद्द्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात आज दुकानदार व्यापारी असोसिएशनतर्फे वाघोली येथे वीजबिल माफीसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आधी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेला शब्द पाळावा आणि नंतर उर्जा खाते सोडावे अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली.

आंदोलकांच्या मागण्या काय?

यावेळी आंदोलन करताना आंदोलकांनी सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात आलेले छोट्या-मोठ्या व्यावसायिक, दुकानदारांचे वीजबिल माफ करावे. महावितरण कंपनी आणि ऊर्जामंत्री यांनी वीज जोडणी तोडण्यासाठी दिलेल्या 70 लाख नोटिसा परत घ्याव्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करावी, अशा मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत.

दरम्यान, सरकारने या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रातून ई-मेलद्वारे वीजबिलं गोळा करून त्यांची मंत्रालयासमोर होळी करण्यात येईल, असं आंदोलकांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा?; चंद्रकांतदादांनी दिली देशभरातील उदाहरणं(Opens in a new browser tab)

केंद्र सरकारकडून वीजपुरवठ्यासाठी नवे नियम; जाणून घ्या सामान्य नागरिकांना काय मिळणार(Opens in a new browser tab)

आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे

(Pune protest against electricity bill, demands resignation of Nitin Raut)

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर