AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : पुरंदरेंइतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही; शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रंथप्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले पवार?

महाराष्ट्रात काही पुस्तके ही खूप लोकप्रिय ठरली, लोकांनी घराघरात ठेवली ती पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके... बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही, असे शदर पवार म्हणाले.

Sharad Pawar : पुरंदरेंइतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही; शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रंथप्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले पवार?
शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शरद पवार Image Credit source: tv9
| Updated on: Jul 23, 2022 | 4:36 PM
Share

पुणे : गेल्या काही काळात अनेकांनी शिवचरित्र (Shiv charitra) लिहिली, त्यात काहींनी वस्तुस्थिती मांडली, काहींनी धादांत खोटी माहिती लिहिली, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते तर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांवर आसूड ओढला. काहींनी चुकीचा इतिहास लिहिला, असे म्हणत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर टीकाच केली. हा ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांचा असा समज होईल हे शिवचरित्र आहे. मात्र हे शिवचरित्र नाही, असे शरद पवार म्हणाले.

‘शिवाजी महाराजांचे राज्य रयतेचे’

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य कधी भोसल्यांचे राज्य झाले नाही, ते रयतेचे राज्य राहिले आहे. शिवछत्रपती यांची समाधी महात्मा फुले शोधून काढली. हे महत्त्वाचे काम महात्मा फुले यांनी केले. हे करत असताना शिवछत्रपतींचा उल्लेख फारसा कधी छत्रपती म्हणून केला नाही, तर कुळवाडी, कुलभूषण असा केला. काही घटकांनी शिवछत्रपती यांचे चरित्र लिहिताना धर्मांधता कशी वाढेल, अशा पद्धतीने लिहिला, असा आरोप शरद पवारांनी केला.

‘खोलात जायचे नाही’

महाराष्ट्रात काही पुस्तके ही खूप लोकप्रिय ठरली, लोकांनी घराघरात ठेवली ती पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके… बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही. दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांचे योगदान काय, याच्या खोलात जायचे नाही. पण राजमाता जिजाऊ याच शिवाजी महाराज यांच्या गुरू, मार्गदर्शक होत्या, हे स्पष्ट झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

‘खरा इतिहास नव्या पिढीला द्यायचा आहे’

काहींनी शिवचरित्रात मांडलेल्या गोष्टी अनेकांना न पचणाऱ्या डायजेस्ट न होणाऱ्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांनीही खरा शिवाजी मांडला. सत्यावर आधारलेल्या खरा इतिहास नव्या पिढीला द्यायचा आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.