AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात अजूनही पावसाचा यलो अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain | राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढेही कायम राहणार आहे. आगामी तीन दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेले अवकाळीचे संकट अजून टळले नाही. राज्य शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात अजूनही पावसाचा यलो अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागात गारपीटमुळे काश्मीरसारखे चित्र दिसत होते. तुफान गारपीटमुळे शेतात गारांचा खच पडलेला दिसत होता.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 29, 2023 | 9:52 AM
Share

अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. पावसाचा हा धोका अजून पुढील तीन दिवस असणार आहे. राज्यातील अनेक भागात आज देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज दिवसभर विजांसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, नगर, पुणे , छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

अजून तीन दिवस राहणार पावसाची स्थिती

मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस राहणार आहे. हवामान खात्याने मराठवाड्याला यलो अलर्ट दिला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली 40 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत जायकवाडीत संभाजीनगर आणि जालन्याला तीन महिने पुरेल इतके पाणी पोहोचले आहे. जायकवाडीत पाणी 26 हजार क्यूसेकने पाणी येत आहे. अवकाळी पावसामुळे देखील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत होतेय वाढ. जळगावात २२ वर्षांत प्रथमच गारठा निर्माण झाला आहे. नोव्हेंबरात दिवसाचे तापमान २२ अंशावर आले आहे. भारतातील मान्सूनचा पॅटर्न बदलला असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

अवकाळीचा फटका धान पिकाला

अवकाळी पावसामुळे नागपुरात धान पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. त्यासोबतंच रब्बीतील हरभरा आणि तूर पिकालाही फटका बसलाय. राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे राज्यभरात साधारण १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेय. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साधारण १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेय. बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या आपत्तीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, १६१ जनावरे दगावली आहेत. अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांना फटका बसला असून, विदर्भातील धान पिकाचं मोठं नुकसान झाले आहे.

का पडत आहे पाऊस

अग्नेय राजस्थान व लगतच्या पश्चिम मध्य प्रदेश भागावर चक्रीय वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैऋत्य अरबी समुद्रावरही एक चक्रीय परिस्थिती आहे. यामुळे पश्चिम व उत्तर भागातील आद्रता वाढली असल्यामुळे राज्यात अजून दोन ते तीन दिवस हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

ही ही वाचा… राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पडत आहे पाऊस? शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Follow Us
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?