Rahul Gandhi : बलात्कार, हिंसाचार, गर्भपात, राहुल गांधींनी मांडले महिला अत्याचाराचे हादरवणारे आकडे; वाचून धक्काच बसेल!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची काय स्थिती आहे, याबाबत माहिती दिली. त्यांनी महिलांवरील अत्याचाराच आकडेच मांडले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी या आकडेवारीतून सांगितले.

Rahul Gandhi Rally : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची काय स्थिती आहे, याबाबत माहिती दिली. त्यांनी महिलांवरील अत्याचाराच आकडेच मांडले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी या आकडेवारीतून सांगितले.
तरुणींनी मंचावर जात मांडल्या व्यथा
राहुल गांधी यांनी आपल्या सभेचे स्वरुप संवादात्मक ठेवले होते. या सभेमध्ये अनेक मुलींनी मंचावर जाऊन अडचणी मांडल्या. काही मुलींनी घरातून होत असलेली अडवणूक, रस्त्यावर फिरताना काढली जाणारी छेड, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष यावर याबाबत सांगितले. दुसरीकडे राहुल गांधी यांनीदेखील तरुणींना, मुलींना पुढे जाण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच सध्या देशात महिलांची स्थिती खूप गंभीर असल्याचे सांगताना काही आकडेवारी सांगितली.
बऱ्याच प्रकरणांची नोंद होत नाही
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात तसेच तरुणींसोबतच्या संवादात एक पीपीटीही सादर केली. या पीपीटीत त्यांनी भारतातील महिला हिंसाचाराचे आकडे मांडले. देशात अनेक ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार होतात. हिंसाचार होतो. परंतु बऱ्याच प्रकरणांची नोदं होत नाही, अशी चिंता यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केली. देशात मुली जन्मन्याआधीच प्रत्येक वर्षी साडे चार लाख मुलगी अर्भकांची हत्या केली जाते. या सभेला आलेल्या साधारण 80 टक्के मुलींचा विनयभंग करण्यात आलेला आहे. हा विनयभंग शाळा, कॉलेज, बसमध्ये, रस्त्यावर, रेस्टॉरंटमध्ये होतो. साधारण 29 टक्के महिलांवर शारीरिक हिंसाचार होतो. घरी, रस्त्यावर महिलांना मारले जाते. सोबतच 100 पैकी 6 महिलांवर भारतात बलात्कार होतो, अशी धक्कादायक आकडेवारी राहुल गांधी यांनी मांडली.