Video : ‘अहो तेव्हा व्हायची लग्न! तुमचं अजून नाही झालं’ राज्यपालांना राज ठाकरेंनी सुनावलं

| Updated on: Mar 09, 2022 | 9:09 PM

गेल्या काही दिवसातल्या राज्यपालांच्य (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्यांवरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत.

Video : अहो तेव्हा व्हायची लग्न! तुमचं अजून नाही झालं राज्यपालांना राज ठाकरेंनी सुनावलं
राज्यपालांच्या लग्नावरून राज ठाकरेंच्या कोपरखिळ्या
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : आज मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj thackeray Speech) राज्यपालांना टार्गेट करताना दिसून आले. गेल्या काही दिवसातल्या राज्यपालांच्य (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्यांवरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत. त्यांनी राज्यपालांच्या ब्रम्हचार्याचाही खरपूस समचार घेतलाय. राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना, सावित्रिबाई फुले (Savitribai Phule) आणि महात्मा फुले यांच्या लग्नातील वयावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज ठाकरे आज राज्यपालांवर तुटून पडताना दिसून आले. तर छत्रपती शिवाजी महाजारांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही ते बरसले आहेत. आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या त्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

महापुरूषांबद्दल काहीही बोलत सुटतात

तुम्हाला काही माहितीये का? महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं. रामदास स्वामींनी काय लिहीलेय, छत्रपतींनी काय लिहीलंय ते माझ्या घरात लावलंय मी. शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. वाचा ते निश्चयाचा महामेरू…कोण श्रीमंतयोगी…असे म्हणत त्यांनी राज्यपालांचा समाचार घेतालाय. तसेच आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कळतं श्रीमंतय, अशी कोपरखिळीही त्यांनी मारली आहे. एका कार्यक्रमात बोलताना रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाजांबद्दल राज्यपलांनी वादग्रस्त विधान केले होते. रामदास स्वामी गुरू म्हणून नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विराचले नसते या राज्यपालांच्या विधानावरून राज ठाकरे भडकले होते.

निवडणुकांसाठी राजकारण सुरू

यानंतर कोंबड्या लागल्या झुंजायला, मग आता दोन दिवसांनंतर कळलं, निवडणुका होत नाही, मग सगळे पुन्हा शांत, असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांचाही समाचार घेतला आहे. तसेच निवडणुका लांबणीवर पडणार हे नोव्हेंबरपासून सांगत होतो. मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. मी काही पत्रकारांशीही बोललो होतो, निवडणूक आली ना की ती चढायला लागते. आता बरोबर कळला तुम्हाला निवडणुकीचा अर्थ, साला चढायला लागते म्हणजे काय? तर अशी ती स्पर्श करते. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना, असेही ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण; मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?