त्याला इथे कुरळे केसं आहेत, सालं उलटं झालंय का… आधी ठोकले नंतर राज ठाकरेंना हसूच आवरेना
Raj Thackeray Speech : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात पांढऱ्या पट्टीच्या वादावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. यावर बोलताना ठाकरे यांनी मुनींच्या केसांवर भाष्य केले आहे.

मुंबईतील दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जैन मुनी निलेशचंद्रन यांच्यावर टीका केली आहे. जैन मुनींच्या कुरळ्या केसांवर बोलताना राज ठाकरेंना हसू अनावर झालं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
राज ठाकरेंचे जैन मुनींच्या केसावर भाष्य
आपल्या भाषणात पांढऱ्या पट्ट्या आणि जैन मुनींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘काही जैन चांगले काम करत असतील. पण, एक जण कोण आहे भाजपचा? त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कुरळ्या केसाची दाढी घेऊन फिरतो. त्याला (दाढीला हात लावत) इथे कुरळे केस आले. सालं उलटं झालं की काय सालं.(राज ठाकरेंना हसू अनावर) तो म्हणतो आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलं आहे का कधी? आम्हाला कोणता वाद नको, भांडण नको आहे, पण जर कुणी वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.’
तुमच्या मनगटात किती दम हे महाराष्ट्र ओळखतो
राज ठाकरेंच्या या टीकेनंतर आता जैन मुनी निलेशचंद्रन यांनीही आक्रमत पवित्रा घेत उत्तर दिले आहे. ‘हा वाद केवळ व्होट बँकेसाठी असून तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो. मंत्रालयात बसणारा राम आहे आणि त्याचा हनुमान महाराष्ट्रात आहे. जे लोक भगव्याला हिरवं करण्याचा विचार ठेवतात, त्यांना सरळ करायला हनुमान समर्थ आहे. माझ्या समाजाला जिथे गरज पडेल, तिथे मी लढायला तयार आहे असं जैन मुनी यांनी म्हटलं आहे.
जे मोदींचे विरोधक ते माझे विरोधक
पुढे बोलताना जैन मुनी म्हणाले की, “माझे केस वाकडे की फिकडे, हा माझा प्रश्न असून मी कुणाला उत्तर देण्यास बांधील नाही. जे मोदी आणि योगींचे विरोधक आहेत, तेच माझे विरोधक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादरमधील कबुतरांचा वाद राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उकरून काढल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.