AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात काय फरक आहे? जाणून घ्या मोठा फरक

श्रावण महिना सुरु होताच शिवभक्त हे शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी गर्दी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यामध्ये काय फरक असतो? जाणून घ्या सविस्तर

शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात काय फरक आहे?  जाणून घ्या मोठा फरक
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 06, 2026 | 3:25 PM
Share

श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्त भगवान शिव यांना जलाभिषेक करताना पाणी, दूध, बेलपत्र, धोतरा, भांग आणि विविध पूजासाहित्य अर्पण करतात. मात्र, अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यात नेमका काय फरक आहे? दोन्ही भगवान शिव यांचेच स्वरूप असले तरी त्यांच्या उत्पत्ती, धार्मिक मान्यता आणि आध्यात्मिक महत्त्वामध्ये मोठा फरक असल्याचे पुराणांमध्ये सांगितले आहे.

शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग म्हणजे काय?

हिंदू धर्मात शिवलिंग हे भगवान शिवाच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. देशभरातील मंदिरांमध्ये तसेच अनेक घरांमध्ये शिवलिंगाची स्थापना केली जाते. हे शिवलिंग दगड, धातू, माती, संगमरवर, स्फटिक किंवा इतर पदार्थांपासून तयार केले जाते. त्याची स्थापना करताना वैदिक मंत्रोच्चार आणि प्राणप्रतिष्ठा विधी करून भगवान शिवाचे आवाहन केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, नियमित पूजा, अभिषेक आणि मंत्रजपामुळे शिवलिंगातील दैवी शक्ती जागृत राहते.

दुसरीकडे, ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित स्वरूप मानले जाते. ज्योतिर्लिंगाची निर्मिती मानवाने केलेली नसून त्यामध्ये भगवान शिवाची दिव्य चेतना आणि शक्ती सदैव वास करत असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्योतिर्लिंगांना सामान्य शिवलिंगापेक्षा अधिक पवित्र आणि विशेष मानले जाते.

ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली?

शिवपुराणातील कथेनुसार, एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी भगवान शिव अनंत तेजस्वी प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी ब्रह्मा आणि विष्णूंना त्या प्रकाशस्तंभाचा आरंभ आणि अंत शोधण्याचे आव्हान दिले. भगवान विष्णूंनी खाली तर ब्रह्मदेवांनी वरच्या दिशेने शोध घेतला, मात्र दोघांनाही त्या अनंत ज्योतीचा शेवट सापडला नाही. अखेर त्यांनी भगवान शिवाचे श्रेष्ठत्व मान्य केले. धार्मिक मान्यतेनुसार, या दिव्य प्रकाशस्तंभाचे 12 भाग पृथ्वीवर विविध ठिकाणी प्रकट झाले आणि तेच आज 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जातात.

टीप : वरील माहिती हिंदू धर्मातील धार्मिक श्रद्धा, पुराणांमधील कथन आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याचा उद्देश धार्मिक माहिती देणे हा असून, संबंधित श्रद्धांचा स्वतंत्रपणे आदर राखण्यात आलेला आहे.

Follow Us
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला