Santosh Deshmukh Case : सर्वात मोठी बातमी, CID च्या आरोपपत्रातून अखेर मुख्य मास्टरमाइंडच नाव समोर

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केलय. त्यातून महत्त्वाची माहिती समोर आलीय. मागच्या दोन महिन्यापासून राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्या मोर्चे निघाले, आंदोलन झाली.

Santosh Deshmukh Case : सर्वात मोठी बातमी, CID च्या आरोपपत्रातून अखेर मुख्य मास्टरमाइंडच नाव समोर
Santosh Deshmukh-Walmik Karad
| Updated on: Mar 01, 2025 | 1:35 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. आता सीआयडीने 1800 पानाच आरोपपत्र दाखल केलय. त्यानुसार वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे-जे मोर्चे निघाले, आंदोलन झाली त्यावेळी विविध नेत्यांनी, ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते. आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टरमाइंड आहे.

या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.

ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले

संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते सीआयडीच्या हाती लागलं. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

किती मागण्या केलेल्या?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच आठवड्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यांनी सात मागण्या केलेल्या. त्यातील उज्वल निकम यांच्या नियुक्ती एक मागणी सरकारने मान्य केली. संतोष देशमुख प्रकरणात अजूनही समाधानकारक तपास होत नाहीय असं कुटुंबियाचं म्हणणं होतं.