AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी दोन पावले मागे आलो, पण आता…शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश

Sharad Pawar: आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी राहवी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा.

महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी दोन पावले मागे आलो, पण आता...शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश
शरद पवारImage Credit source: ANI
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 21, 2024 | 4:43 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे. शिवसेना उबाठाकडून सर्वाधिक 21 जागेवर उमेदवार उभे करण्यात आले होते. काँग्रेसकडून 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यात काँग्रेसला 13, शिवसेनेला 9 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा पैकी 8 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे आता शरद पवार यांनी विधानसभेसाठी व्यूहरचना सुरु केली आहे. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, असे शरद पवार यांनी शुक्रवारी म्हटले आहे.

विजयी खासदारांची बैठक

शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यात आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवार आणि जयंत पाटील उपस्थितीत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बैठकीला शरद पवार गटातील राज्यातील सर्व खासदार उपस्थित होते. त्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील एकजूट राहवी म्हणून मी दोन पावले मागे आलो. खरंतर लोकसभेला आपल्या पक्षाला जास्त जागा हव्या होत्या. परंतु आता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे.

लोकांची जास्तीत जास्त कामे करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी राहवी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा. राज्य हातात घ्यायचं आहे याची तयारी ठेवा. लोकांची जास्तीत जास्त काम करा. लोकांचा फारसा संबंध दिल्लीत येत नाही. राज्यात प्रश्न महत्वाचे असतात. त्यामुळे विधानसभेच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर या बैठकीला आले आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात…

विजयामुळे कोणीही हवेत राहू नका. आपण आता संघर्ष केला आहे. मात्र लढाई मोठी आहे. आपल्याला अजून ती लढायची आहे. ऑक्टोबरमध्ये सगळ्यांना काम करायच आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच रणशिंग फुंकले. मला आता कुठे निवडून आल्यासारखे वाटत आहे. भोरमध्ये माझी विजयाची मिरवणूक ५ तास चालली. त्यामुळे मला बारामतीचा दौरा रद्द करावा लागला होता.

माढा लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले की, पवारसाहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माझ्या विजयात करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा अनेक पटीत माझ्याकडून कामकाज झाले पाहिजे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी