Rajyasabha election result : अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी हात केले वर, शिवसेनाच संजय पवार यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे सूचक वक्तव्य?

| Updated on: Jun 11, 2022 | 9:13 PM

अपक्षांचे मॉनिटरिंग शिवसेना करीत असल्याचे सांगत, शिवसेनेच्या तिसऱ्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचे संकेतच यानिमित्ताने जयंत पाटील यांनी दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी पराभव केला.

Rajyasabha election result : अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी हात केले वर, शिवसेनाच संजय पवार यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे सूचक वक्तव्य?
Jayant Patil
Follow us on

पंढरपूर – राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha election)झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील (MVA)मतभेद समोर येताना दिसत आहेत. अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती, अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी केले आहे. यामुळे झालेला पराभव हा शिवसेनेमुळे झाल्याचे त्यांनी या वाक्यातून सूचित केले असल्याचे दिसते आहे. अपक्षांचे मॉनिटरिंग शिवसेना करीत असल्याचे सांगत, शिवसेनेच्या तिसऱ्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचे संकेतच यानिमित्ताने जयंत पाटील यांनी दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी पराभव केला. पाच ते सहा अपक्षांनी महाविकास आघाडीला मान्य केले नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी नावे सांगणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी या सहा आमदारांची नावे उघड केली होती.

दुसऱ्या पसंतीच्या मतांनी घात केला – जयंत पाटील

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची य निवडमुकीत झालेली चूकही सांगितली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांकडे लक्ष दिले असे त्यांनी सांगितले. मात्र त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांनी घात केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते आघाडीकडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पराभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला गांभिर्याने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांचा झालेला पराभव गांभिर्याने घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी अनिल परब, एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी वर्षा निवासस्थानी नेमके काय घडले याचा आढावा घेतला. आगामी विधानपरिषदांच्या मतदानातही भाजपाने एक उमेदवार जास्त दिला आहे, आता त्या निवडणुकीत तरी हा प्रकार होऊ नये, याकडे आता मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे लक्ष असेल. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्या बैठकीतही नेमका कुठे दगाफटका झाला, याची चर्चा केली. तसेच विधान परिषदेबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

उमेदवार राष्ट्रवादीचा असता तर पराभव झाला नसता-सुजय विखे पाटील

तर दुसरीकडे भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उमेदवार शिवसेनेचा असल्यानेच पराभव झाल्याचे सांगितले आहे. हाच उमेदवार राष्ट्रवादीचा असता तर पराभव झाला नसता, असे त्यांचे म्हणणे आहे.