AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा

| Updated on: Aug 16, 2026 | 9:08 AM
Share

Maharashtra News LIVE Updates : राज्यातील रस्त्यावरील खड्डे , वाढत्या अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर चाकणमधील कंपन्या बंद पडणार असून त्याचाही मुद्दा ऐरणीवर आलाय.

Maharashtra News LIVE : नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा
Big breaking live update Image Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Aug 2026 09:08 AM (IST)

    सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख, चर्चांना उधाण

    नाशिकमधील सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.  नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे काही दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.  पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहे.  या फोटोच्या खाली पालकमंत्री व कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवर उल्लेख आहे.  नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

  • 16 Aug 2026 09:04 AM (IST)

    Dharashiv : धाराशिवच्या ड्रग्ज रॅकेटचे पुणे कनेक्शन उघड

    धाराशिवच्या कळंबच्या एमडी ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे आता पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. धाराशिव जिल्यातील कळंब ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती वाढली. या प्रकरणी एमडी ड्रग्ज प्रकरणात चौथा आरोपी अटकेत आला आहे. कळंब शहरातील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास आता मावळपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील वडगाव येथील अक्षय रिटे याला पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात खड्ड्यांच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून उद्या रस्त्यावरील खड्ड्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी पाहायला मिळात आहे. बॅनरबाजीतून गरिकांना मोर्चासाठी आवाहन करण्यात येत आहे. ठाकरेंच्या युवा सेनेने लावलेल्या बॅनरची चर्चा नाशिकमध्ये जोरदार चर्चा होत आहे. त्यात पुण्यातील चाकणमधून 20 कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाणार आहेत. या कंपन्यांमुळे अनेकाचे रोजगार बुडणार आहे. चाकणाचा मुद्दाही विरोधकांनी लावून धरला आहे. सत्ताधारी देखील चाकणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देत आहे. दुसरीकडे अभिजीत दीपके यांनीही सरकारी शाळेचा मुद्दा लावून धरला आहे. यासह महाराष्ट्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या.

Published On - Aug 16,2026 8:59 AM

Follow Us