इतर राज्यात रविवारच्या Neet परीक्षेसाठी स्पेशल बसेस, मुंबईत बेस्ट संपावर अद्यापही तोडगा नाही…
उद्या रविवार २१ जून रोजी असलेल्या नीट परीक्षेच्या निमित्ताने एकीकडे रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र, सेकंड जीवन वाहिनी असलेल्या बेस्टचा संप मात्र न मिटल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणार असल्याचे म्हटले जाते.

एकीकडे उद्या रविवारी होणाऱ्या Neet परीक्षेसाठी जय्यद तयारी सुरु आहे. अन्य राज्यात नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बसेसचे आयोजन केले जात आहे. आणि मुंबईची सेंकड लाईफ लाईन म्हटल्या जाणाऱ्या बेस्टच्या गुरुवारी रात्रीापासून सुरु झालेल्या बेस्ट संपावर अद्यापही तोडगा निघालेला नसल्याचे विदारक चित्र आहे. मुंबईत शनिवारी दुसऱ्या दिवशी देखील बेस्टचा संप मिठलेला नाही. बेस्टच्या आजी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या १२ संघटनांनी मिळून दोन दिवसांपासून मुंबईला वेठीस धरले आहे. या प्रकरणात काल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची बैठक घेऊनही संपावर तोडगा न निघाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून संप सुरु आहे. या संपावर दोन दिवस झाले तरी तोडगा न निघाल्याने मुंबईकरांना अक्षरश: वेठीस धरण्याचा प्रकार सुरु झाला आहे. बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीने हा संप सुरु केला असून त्यांची मागणी निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची थकलेली ग्रॅज्युईटीची देणी द्यावी आणि बेस्टचे मुंबई महानगर पालिका बजेटमध्ये विलीनीकरण करण्याची आहे. बेस्टच्या संपामुळे रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे इतर राज्यात नीट परीक्षेसाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईत बेस्टच्या संपावर तोडगा न निघाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
रेल्वेचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द
बेस्टच्या संपावर तोडगा निघाला नसला तरी मुंबईची लाईफ लाईन रेल्वेने नीट परीक्षेमुळे रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केल्याचे जाहीर केले आहे. हा एक त्यातल्या तात दिलासा म्हटला जात आहे. बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली. त्यात त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची बैठक घेतली. तरीही संपावर तोडगा निघाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बेस्टमधील १२ संघटनांनी संप केलेला आहे. या संपामुळे मुंबईचे जनजीवन या भयंकर उकाड्यात स्वस्तातील प्रवासी साधन नसल्याने विस्कळीत झाले आहे.