पहाटेची वेळ, अचानक धुराचे लोट उठले अन् एका क्षणात.. ठाण्यात अग्नितांडव, 2 जण कचाट्यात; नेमकं काय घडलं?

ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका अग्निशमन जवानासह पालिकेच्या सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

पहाटेची वेळ, अचानक धुराचे लोट उठले अन् एका क्षणात.. ठाण्यात अग्नितांडव, 2 जण कचाट्यात; नेमकं काय घडलं?
thane fire
| Updated on: May 21, 2026 | 8:19 AM

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसराला आज (२१ मे) पहाटे भीषण आग लागली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मार्केटमधील अनेक दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाले. ही आग विझवताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात अग्निशमन दलाचे एक जवान आणि रात्रपाळीवर असणाऱ्या एका सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.

कापड, प्लास्टिकमुळे आग भडकली

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी गजबजलेले असणारे गावदेवी भाजी मार्केट पहाटेच्या वेळी शांत होते. मात्र, पहाटे ४ च्या सुमारास अचानक मार्केटमधून धुराचे लोट निघू लागले. त्यानंतर पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने आणि विविध साहित्याची गोडाऊन आहेत. कापड, प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

या आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान ५ अग्निशमन गाड्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मार्केटमधील अरुंद गल्ल्या आणि धुराचे प्रचंड साम्राज्य यामुळे सुरुवातीला आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते. तरीही जवानांनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असलेले अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (४३) आणि रात्रपाळीवर असणारे सुरक्षारक्षक काळू गाडेकर (५३) आगीच्या कचाट्यात सापडले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे मार्केटमध्ये लोकांची गर्दी नव्हती. ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कारण अस्पष्ट

मात्र या भीषण आगीत कपड्यांची दुकाने आणि गोडाऊन जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन भाजी मार्केटमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरातील वाहतुकीवर तसेच सकाळच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Follow Us