Kalyana Badlapur Rain : कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधील पूरस्थितीचे धडकी भरवणारे PHOTOS

Kalyana Badlapur Rain Update : कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. या भागातून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. धोक्याच्या पातळीवरुन या नद्या वाहत आहेत. त्याचा फटका या भागाला बसला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे काही PHOTOS

| Updated on: Jul 25, 2024 | 3:54 PM
1 / 5
कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

2 / 5
कल्याण  शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

कल्याण शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

3 / 5
उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

4 / 5
बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

5 / 5
अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.