AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, मुस्लिम नेत्याची बीसीसीआयवर टीका

IND vs PAK : 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. अशातच आता भारतातील एका बड्या मुस्लिम नेत्याने या सामन्याला विरोध केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

IND vs PAK : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, मुस्लिम नेत्याची बीसीसीआयवर टीका
Waris PathanImage Credit source: Google
| Updated on: Feb 14, 2026 | 7:09 PM
Share

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये टी 20 वर्ल्डकपच्या लीग सामन्यात रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशातच आता एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी या सामन्याला विरोध केला आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत बोलताना म्हटले की, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हा शहीदांचा अपमान आहे आणि असे सामने थांबवले पाहिजेत. वारिस पठाण नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले वारिस पठाण?

भारत पाकिस्तान सामन्यावर बोलताना वारिस पठाण यांनी म्हटले की, पुलवामा हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, पहलगाम हल्ला आणि अलिकडच्या लाल किल्ल्याजवळील स्फोटात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात आहे. यामुळे देशावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, मात्र याच काळात पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे हे समजण्यापलिकडचे आहे. आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव चालवले, परंतु त्यानंतरही भारत पाकिस्तानसोबत सामना खेळत आहे. ज्या बहिणींचे कुंकू पाकिस्तानने नष्ट केले त्यांना आपण काय उत्तर देणार? ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे.’

बीसीसीआयवर टीका

पुढे बोलताना वारिस पठाण म्हणाले की, ‘पुलवामा हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत हे खूप दुःखद आणि आश्चर्यकारक आहे, या हल्ल्याक जैश-ए-मोहम्मदचा सहभाग होता. लाल किल्ल्यावरील हल्ल्यातही जैश-ए-मोहम्मदचे नाव घेतले जात आहे. ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे, तसेच पाकिस्तान दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देतो. जर अमित शाह, जय शाह आणि बीसीसीआयमध्ये राष्ट्रवाद किंवा देशभक्तीचा थोडासाही अंश शिल्लक असेल तर भारताने पाकिस्तानशी सामने खेळू नयेत.’

‘तुम्ही बहिणींना काय उत्तर द्याल?’

वारिस पठाण यांनी पुढे बोलताना म्हणाले की, ‘पहलगाममध्ये ज्या बहि‍णींचे कुंकू नष्ट झाले त्यांना आपण काय उत्तर देणार? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाखाली पर्यटकांना त्यांच्या बायका आणि मुलांसमोर गोळ्या घातल्या. टीव्ही चालू करून सामना पाहिला तर आपल्याला आपल्या बहिणींचे कुंकू आठवणार नाही का? फक्त काही रुपयांसाठी जेव्हा माझ्या देशाचा सन्मान आणि आदर धोक्यात असतो तेव्हा मी अशा रुपयांवर थुंकतो.’

Follow Us
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर