AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : उस्मान तारिकच नव्हे तर हे दोन खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक, सूर्या सेनेची चिंता वाढली

IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे चर्चेत आला आहे. त्याच्यासह इतर दोन खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.

IND vs PAK : उस्मान तारिकच नव्हे तर हे दोन खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक, सूर्या सेनेची चिंता वाढली
ind vs pak 2 PlayerImage Credit source: Google
| Updated on: Feb 14, 2026 | 2:53 PM
Share

टी 20 वर्ल्डकपमध्ये रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे चर्चेत आला आहे. तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो असं बोललं जात आहे. उस्मानच्या कामगिरीवर या सामन्याचा निकाल अवलंबून असू शकतो. मात्र आता उस्मान तारिकसह इतरही असे दोन खेळाडू आहेत जे भारताची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंथा मेंडिसने भारताला या खेळाडूंपासून सावध राहण्यास सांगितले आहे. हे खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊयात.

भारताला या खेळाडूंपासून सावध राहण्याची गरज

अजंथा मेंडिसने उस्मान तारिकसह अबरार अहमद आणि सैम अयुबपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अजंथा मेंडिसने म्हटले की, कोलंबोतील स्टेडियमवर पाकिस्तानचे सर्वात मोठे शस्त्र अबरार अहमद आणि सैम अयुब ही फिरकी जोडी असू शकते. या ठिकाणी कॅरम बॉल बॅक-स्पिनच्या मदतीने टाकल्यास तो स्किट करतो. त्यामुळे त्यांना प्रेमदासा येथील कोरड्या पिचवर नैसर्गिकरित्या फायदा होऊ शकतो. अबरार आणि सैम अयुब हे असे गोलंदाज आहेत जे बॅक-स्पिनवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना पिचचा फायदा मिळू शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून भारताला सावध रहावे लागणार आहे.

कॅरम बॉल गेमचेंजर ठरणार

पुढे बोलताना मेंडिसने सांगितले की, टी-20 क्रिकेटमध्ये बॅटर बॉलरचा अंदाज घेण्यात वेळ घालवत नाहीत, ते शक्य तितक्या लवकर मोठे शॉट मारतात. त्यामुळे त्यांना बॅक-स्पिनशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. जेव्हा पिच ड्राय असते तेव्हा चेंडू जास्त स्किट करतो. यामुळे बॅटर बोल्ड आणि एलबीडब्ल्यू होण्याची शक्यता आणखी वाढते. बॅटर कॅरम बॉल ओळखू शकला नाही तर त्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

अबरार आणि सैम अयुब का धोकादायक?

अजंथा मेंडिसने म्हटले की, अबरार आणि अयुब वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतात. यांचा योग्य वापर केला तर ते खूप प्रभावी ठरू शकतात. कारण दोघांचेही त्यांच्या व्हेरिएशनवर चांगले नियंत्रण आहे. यामुळे फलंदाज गोंधळात पडू शकतो. जर गोलंदाजाने एकाच षटकात सहा कॅरम बॉल टाकले तर फलंदाजाला त्याची सवय होईल. त्यामुळे हा चेंडू सरप्राईज म्हणून वापरला पाहिजे, त्यामुळे याचा गोलंदाजांना चांगला फायदा मिळेल.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.