‘ठाण्यात येणारी अवजड वाहतूक रोखणार’, आनंद परांजपे संतापले, वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.

'ठाण्यात येणारी अवजड वाहतूक रोखणार', आनंद परांजपे संतापले, वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 3:35 PM

ठाणे : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी एमएसआरडीसीची असल्याने त्यांनी तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी, जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच या मार्गावरील अवजड वाहतूकही रस्ते दुरुस्ती होईपर्यंत थांबवावी. येत्या आठ दिवसात याबाबत भूमिका न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

‘महापौरांचा साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न’

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्याविरोधात ठाणेकरांमध्ये आक्रोश आहे. या आक्रोशाला राष्ट्रवादी काँग्रेसने वाचा फोडली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात आनंद परांजपे यांनी ठाणे शहरातील रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी एमएसआरडीसीकडून पार पाडली जात नाही. महापौर रात्रीच्या अंधारात गणेशोत्सवाचे विसर्जन होत असताना साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न करीत होते, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

निवेदनात नेमकं काय म्हटलंय?

“ठाण्याला आज पर्यायी रस्त्याची गरज आहे. कोपरी पूल तयार आहे. त्याच्या दर्जाबाबत ठाणेकरांना देणेघेणे नाही. जर हा पूल तयार झाला आहे तर तो ठाणेकरांसाठी खुला करायला हवाय. ठाण्यात मेट्रोची कामे सुरु आहेत. ठाण्यातील उड्डाणपुलांवर खड्डे आहेत. हे उड्डाणपूल एमएसआरडीसीचे आहेत. ठामपा आणि एमएसआरडीसीमध्ये ताळमेळ नाही. ते एकमेकांकडे बोटे दाखवतात. त्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत. हायवेची जबाबदारी एसआरडीसीकडे आणि अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी ठामपाकडे आहे. एमएसआरडीसी खाते शिवसेनेकडे आहे आणि ठामपातही शिवसेनेची सत्ता आहे. ठामपात सेनेला स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीची गरज नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले होते. त्यामुळे या खड्ड्याांची जबाबदारीही शिवसेनेचीच आहे. कामाचा दर्जा तपासणे ही जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे”, असं निवेदनात म्हटलं आहे.

आंदोलनाचा इशारा

“आम्ही पालकमंत्र्यांना याबाबत विनंती करतो की, त्यांनी स्वत: लक्ष घालून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी; अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही”, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

‘गेल्या 15 दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त’

“दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. ठाणे शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व 8 हे मुख्य महामार्ग जातात. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. सद्यस्थितीमध्ये या रस्त्यावर मोठ-मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे”, असं राष्ट्रवादीने निवेदनात म्हटलं आहे.

‘कोपरीचा पूल तयार होऊनही वाहतूक सुरु नाही?’

“ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी फॉरेस्ट हिल रोडचा आणि कोस्टल रोडचा पर्याय निर्माण करण्यात आला होता. फॉरेस्ट हिल रोडचा प्रस्ताव सन 2009 पासून प्रलंबित आहे. तर, मोघर पाडा येथे 4 वर्षांपूर्वी एम. एस. आर. डी. सी.ने पूल बांधण्यासाठी ना हरकत दाखला मागितला होता. त्याची रक्कम आणि ना हरकत दाखला देऊनही त्याचे काम पुढे सरकलेले नाही. तसेच, कोपरीचा पूल तयार होऊनही वाहतूक सुरु झालेली नाही. या सर्व प्रकारामुळे ठाणेकरांच्या मनात संतप्त भावना आहेत. याचा विचार करुन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही”, असं परांजपे आणि मुल्ला यांनी निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा : ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.