AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई तोडण्याचा आरोप, हा भाजप नेता म्हणाला, ‘उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मूर्खांच्या…’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव आहे असा आरोप केला होता. त्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई तोडण्याचा आरोप, हा भाजप नेता म्हणाला, 'उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मूर्खांच्या...'
MUMBAI MAHANAGAR PALIKA Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 31, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : 31 ऑगस्ट 2023 | ज्या 106 हुतात्म्यांवर गोळीबार केले ते काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने केले. त्या 106 हुतात्म्यांच्या रक्ताचे हात काँग्रेसचे आहेत. आता उद्धवजींच्या पक्षाला ते हात लागले आहेत. राष्ट्रवादी तेव्हा नव्हतीच. 106 हुतात्म्यांचे रक्त सांडण्याचे काम आणि पाप हे काँग्रेस आणि उद्धवजींच्या शिवसेनेचे आहे. नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

2047  पर्यंत भारताच्या विकासातील उद्दिष्ट ही शहराच्या विकासाशिवाय होऊ शकत नाही. कारण शहर ग्रोथ हब आहेत. शहराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. म्हणून निती आयोग थिंक टँक म्हणून सहकार्य आणि मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला करणार आहेत. त्यामुळे निती आयोगातून दिल्लीवरून कोणीतरी येऊन इतर काहीतरी बदल करणार आहे ही छिद्रानवेशी भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.

नीती आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहे तर संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार आहे. त्याचे ग्रोथ सेंटर एमएमआर असणार. केंद्र सरकार त्यात निधी देणार, मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करत आहे. या मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्यासमोर या असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. तसेच, उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात जगणारी लोक आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

वीस शहरांची निवड त्यात मुंबई

शहर ग्रोथ हबमध्ये वीस शहरे निवडली जाणार आहेत. त्या वीस शहरांमध्ये पहिल्या चारमध्ये मुंबई आहे. नीती आयोगाने अन्य चार शहरे निवडली असती तर मुंबईला का नाही निवडलं? मुंबईच्या बाबतीत तकलादू भूमिका? विरोधी भूमिका अशी विरोधकांनी कोल्हेकुई केली असती. त्यांना आज बोलायला जागा नाही म्हणून खोटे बोलत आहेत, असे ते म्हणाले.

जयंत पाटील यांचा अभ्यास कच्चा

जयंत पाटील यांचा मुंबईशी संबंध काय? त्यांचे मुंबईकरांशी लेन देन काय आहे? जयंत पाटील यांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांचे भाषण असत्य आहे असा टोला त्यांनी लगावला.

पूर्ण ग्रुप म्हणून एमएमआरचा विषय

एमएमआर म्हणजे केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर त्यात नऊ अन्य महानगरपालिका आहेत. मग नऊ महानगरपालिका देशापासून वेगळी करणार असे मुर्खांसारख्या विधान करणाऱ्यांना बे अक्कल म्हणावे नाहीतर काय? उल्हासनगर, ठाणे, मीरा-भाईंदर ही देशापासून वेगळा होणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.