
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संयुक्त घोषणापत्र जारी करतील. पुतीन हे दोन दिवसीय दौऱ्यावर भारतात आले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात विकसीत महाराष्ट्रासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आज राज्यातील शिक्षक संपावर आहेत. पुणे तालुक्यातील आंबेगाव परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून आला. तर आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यात कुरघोडी सुरू आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचा.
तपोवनातील वृक्ष तोडीसंदर्भातील शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका विक्षिप्त
मंत्री गिरीष महाजन यांची शिंदे सेनेच्या आंदोलनावर टीका
तपोवनातील वृक्ष तोडीच्या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजू नका
गिरीश महाजन यांचा शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल
अभिनेत्री मेघा कौरचा कार स्टंट, व्हिडिओ झाला व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोडचा
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
अभिनेत्रीच्या अडचणी वाढणार
मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचा कल्याण पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात छापा
रेल्वेच्या नावाने बनावट पावती पुस्तके छापून पे-अँड-पार्क सुरू करत वाहन चालकांकडून सुरू होती वसुली
दक्षता पथकाने छापा मारत बनावट पावती पुस्तके, बनावट कागदपत्रांसह स्टँड ऑपरेटरला घेतलं ताब्यात
हरिशंकर प्रजापती असे ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव
मुंबईतील जुहू चौपाटीवर संशयास्पद लाल बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या या माहितीमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलीसांनी नागरीकांना या बॅगेपासून दूर जाण्याचं आवाहन केलं आहे. पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत. पोलीसांनी पतासणी सुरू केली आहे.
नागरी समस्यांवर तोडगा निघावा यासाठी कल्याण काँग्रेसने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला आहे. मोर्चादरम्यान घोषणाबाजी करत मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी केडीएमसी सुरक्षा कर्मचारी व पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट झाली. यानंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाणे महापालिकेने दुबार मतदारांची यादी जाहीर केली आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी 200 ते 300 दुबार मतदार असल्याचे आढळून आले आहे. 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ठाण्यात दुबार मतदारांच्या नोंदीवरून महाविकास आघाडीने आरोप केले होते. शिवसेना उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आक्षेप घेत दुबार नावे तत्काळ रद्द करण्याची मागणी केली होती.
मंत्री गिरीश महाजन यांनी पुणे-भोसरी रस्त्यावरील अपघातातील जखमीना मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. पुण्यातील भोसरी परिसरातून मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा जात असताना रस्त्यात दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाला होती. अपघाताची घटना पाहिल्यानंतक महाजन यांनी तातडीने त्यांचा ताफा थांबवला आणि ते अपघातस्थळी पोहोचले. महाजन यांनी जखमी तरुणांची चौकशी करत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
तपोवनातील झाडं तोडून कोणतेही एक्जीबिशन सेंटर उभे केले जाणार नाही. जे टेंडर काढण्यात आले त्याला स्टे देणार. याबाबत मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार. तसेच प्रत्येकाचे समाधान झाल्याशिवाय झाडांना हात लावणार नाही, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
इंडिगो काउंटरजवळ झालेल्या गोंधळानंतर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इंडिगो काउंटरजवळ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महिला प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथकासह कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घेत बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त कुमक बोलावल्याची चर्चा आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळालाय. इंडिगो कंपनीने त्यांच्याकडून घेतलेले पूर्ण पैसे परत करावेत, या मागणीसाठी प्रवाशी आक्रमक झाले आहेत. काही प्रवाशांचे सामान आत नेण्यात आलं आहे. मात्र आता प्रवाशी त्यांचं सामान परत मागत आहेत.
शीतल तेजवानी हीने पिंपरीतील घरी काही पुरावे दडवून ठेवले असल्याची शंका पुणे पोलिसांना आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिच्या पिंपरीतील घराची झाडाझडती घेतली. दुसरीकडे, शीतल तेजवानीला घेऊन पोलीस कोरेगाव पार्कमधल्या घरी दाखल झाले आहेत.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी ही याचिका केली आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. 2014 पूर्वी भाजपा मजबूत स्थितीत नव्हता. पण देवेंद्र फडणवीस आले आणि सर्व चित्र बदललं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर पक्ष कसे चालतील हे देखील ठरवतात असं विधान त्यांनी केलं. इतकंच काय तर भाजपा देवाभाऊमय झाला आहे असंही सांगितलं.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरलाच लागेल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सर्व निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्या असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातल्या दोन्ही वाघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाघांचे मृत्यू लपवण्याचं कारण काय? असा संशय आता प्राणीप्रेमींनी व्यक्त केला आहे. शक्ती आणि रूद्रचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न विचारला जात आहे.
वांद्रे येथील सेंट रेजिस हॉटेलात भाजप आणि ठाकरे सेनेत कामगार युनियनवरुन मोठा वाद झाला आहे. दोन्ही गट आक्रमक होत एकमेकांवर चालून आले आहेत. यामुळे या भागात मोठा पोलिस बंदोबस्त आहे.
शनीशिंगणापूर देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. देवस्थान आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही अटक झाली आहे. सचिन शेटे आणि संजय पवार अशी संशयित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्री सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकातून शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला आहे. टीईटी सक्ती निर्णयाविरोधात आणि इतर विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने शिक्षक बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहे.
डोंबिवली मोठागाव खाडी किनारातील सातपुल परिसरात 107 तितर पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत सुरू केला पंचनामा.
पुणे जिल्ह्यातील लाखेवाडी परिसरात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही.
जळगावच्या चाळीसगाव शहरातील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त आहे. ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या मुख्य गेट जवळ दोन बंदूकधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. उमेदवारा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी होत आहे.
सोलापुरात शिक्षकांच्या वतीने भव्य महामोर्चाच आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांवर टीईटी बंधनकारक केल्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने शिक्षक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
इंडिगोच्या प्रकरणानंतर DGCA ने इंडिगोला नियमात शिथिलता दिली आहे. या नियमामुळे मागच्या तीन दिवसात देशभरात इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द झाली. त्याचा फटका हवाई प्रवाशांना सहन करावा लागला. साप्ताहिक सुट्टीबाबत आधीचेच नियम लागू.
दादर चैत्यभूमी अशोक स्तंभ परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच परिसरातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, महत्वाचे नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात. स्तंभाच्या बाजूला मेटल डिटेक्टर, बॅग तपासणी मशीन बसविण्यात आली आहेत. परिसरात 70 च्या वर पोलीस आणि समता सैनिक दलाचे जवान ही बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
नाशिकच्या शिवशक्तीनगरमध्ये सँट्रो कार घरात घुसली. सिडकोमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ. अंगणात कपडे धुणाऱ्या महिलेच्या अंगावरुन गेली गाडी. महिला गंभीर जखमी,पोलिस तपास सुरू आहे.
टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शिक्षकांचे ठिय्या आंदोलन. अमरावतीत शिक्षकांच्या महामोर्चाला परवानगी नाकारली. अमरावती जिल्ह्यात 12 संघटनांचे हजारो शिक्षक सहभागी. शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अमरावती शाखेकडून निवेदन जारी. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनांकडून केली जाणार निदर्शने.
पुणे – खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आणि प्रचंड खळबळ उडाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला. एक व्यक्ती, एका बंद घराच्या दारात दही–भात, लिंबू ठेवून हळदकुंकू लावून नारळ फोडत होता. सगळी घटना सीसीटीव्ही कॅप्चर झाली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे.
महायुती सरकारची वर्षपूर्ती साजरी करत असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन वर्षभराची उपलब्धी सांगितली पाहिजे. ही सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
आज सकाळी पुणे-नगर महामार्गांवर अहिल्यानगर बायपासवर ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली. यावेळी पुण्याहून बीडकडे निघालेले 27 प्रवासी बचावले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. आग लागताच बस चालकाने बस बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. बाबुर्डी ते आरंगाव परिसरात ही घटना घडली. या आगीत काही प्रवाशांच्या बॅगा आणि इतर सामान जळून खाक झाले.
टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षकांनी हातातील खडू बाजूला ठेवून आंदोलनाची मूठ आवळली आहे. आज सरकारच्या धोरणाविरोधात राज्यातील शाळा बंद आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांनी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरातही शाळांच्या परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. सरकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील असंख्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना एकवटणार आहेत. आज दुपारी 2 वाजता क्रांती चौक ते महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहे.
राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारी 8 डिसेंबर रोजी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 33 पेक्षा अधिक मोर्चे धडकणार आहेत. तर 22 संघटना धरणे आंदोलन करणार असून 17 संघटना साखळी उपोषण करणार आहेत. त्यामुळे नागपूरच्या गुलाबी थंडीत जोरदार घोषणाबाजी ऐकायला मिळणार आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे. या निवडणुकींचा निकाल 21 डिसेंबर रोजीच लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत हा निर्णय दिला आहे. त्यामुळे उमदेवारांमधील धाकधूक कमी झाली आहे.
बीडच्या गेवराई शहराजवळील गढी फाटा येथे मध्यरात्री रोड रॉबरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेलंगणा राज्यातील काही महिला प्रवासी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत आणि मारहाण करत त्यांच्याकडील दागिने व मौल्यवान वस्तू लुटून पळ काढला. महामार्गावर लुटीचा हा थरार एका ट्रक चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ आता समोर आला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडोबा मंदिरातील दोन दरवाजांची लॉक तोडुन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन खंडोबा देवाच्या अंगावरील २१ किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा तब्बल ४१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. धक्कादायक म्हणजे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे रेकॉर्डिंगवर नसल्याने चोरट्यांचा चेहरा कैद होऊ शकला नाही. स्थानिक भक्त वर्ग आणि ग्रामस्थ या चोरीच्या घटनेमुळे आक्रोशित आणि संतप्त आहेत. या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांकडून तपास सुरु असून चोरट्यांचा शोध सुरु आहे
राज्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यव्यापी आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात सामूहिक रजा आंदोलन करत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मालेगाव येथील शिक्षक मोर्चेकरी देखील या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिककडे रवाना झाले आहेत. शिक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा स्तरावर हे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे, ज्यामुळे शैक्षणिक वातावरणात तणाव वाढला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरातील जैस्वाल हॉलजवळ आज सकाळी 9 सुमारास ‘हिट अँड रन’ची एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, एका नवशिक्या ड्रायव्हरने भरधाव वेगात असलेल्या एर्टिगा कारवरील नियंत्रण गमावले. रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीमध्ये जागावाटपाचा तिढा वाढल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाने एकतर्फी निर्णय घेत तब्बल 65 जागांवर लढण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केवळ 17 जागांची ऑफर देण्यात आली आहे. या दोन पक्षांनंतर उरलेल्या 13 जागा इतर घटक पक्षांना वाटून घेण्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिंदेसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा असून, युतीमध्ये जागावाटपावरून रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.
अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर आता 11 ठिकाणी स्टॉग रूम तयार करण्यात आल्या आहेत. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्ट्रॉंग रूमवर राज्य राखीव दलाचे पोलीस आणि अमरावती ग्रामीणचे पोलीस तैनात आहेत. सध्या स्ट्राँग रूम परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ही लावण्यात आले आहेत.
बीड तालुक्यातील केतुरा गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून 87 वर्षीय बाबासाहेब गायकवाड यांना बाळू गायकवाड व इतर दोघांनी काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत बाबासाहेब गायकवाड जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यात आरोपी ‘जा माझ्यावर गुन्हा दाखल कर, मी तीन-तीन महिने फरार राहिलेला माणूस आहे’ असे आव्हान देत असल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहराजवळ असलेल्या औष्णिक वीज केंद्र लगतच्या अंबोरा गावातील आज सकाळची घटना… गावा शेजारी आज सकाळी कोवळ्या उन्हात खेळताना दिसले वाघाचे दोन बछडे… गावकऱ्यांना ही घटना कळताच बछडे पाहण्यासाठी लोकांनी केली एकच गर्दी… घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल… बछडे आणि गावकरी यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत…
अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर आता 11 ठिकाणी स्टॉग रूम उभारण्यात आलेत. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे… प्रत्येक स्ट्रॉंग रूमवर राज्य राखीव दलाचे पोलीस आणि अमरावती ग्रामीणचे पोलीस तैनात आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ही लावले आहेत.
पुण्यातील हवा अतिखराब अवस्थेत आहे. पुण्यातील बांधकाम प्रकल्पांमुळे प्रदुषणात वाढ झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील हवा अतिखराब श्रेणीत आहे… असं देखील सांगण्यात येत आहे.
रेपो रेट 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. ज्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यजदरात 0.25% कपात करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
हिवाळी अधिवेशनाची जोरदार चर्चा सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात 33 मोर्चे धडकणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
जळगावच्या जामनेर येथील अंबिका गॅरेजमध्ये रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गॅरेज आगीच्या विळख्यात सापडले. या आगीत गॅरेजमधील साहित्य, वाहनांचे पार्टस, व इतर वस्तू असे सर्व जळून खाक झाले आहे. जामनेर नगरपालिकेचा अग्निशामक बंब, तसेच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत 1 ते दीड तासानंतर आग नियंत्रणात आणली..
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गांजाच्या लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारातील एका कापसाच्या शेतात थेट गांजाची झाडं लावल्याच समोर आले असून, अंबड पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.
‘अंधारात मोबाईलवर बोलणे आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी’: नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगतची थरारक घटना. नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठ वाजता 18 वर्षीय तनिष नवनाथ परदेशी या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. अंधारात मोबाईलवर बोलत उभा असताना बिबट्याच्या नख्या पोटरीवर ओरखडल्याने तो जखमी झाला, नशीब बलवंतर म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले 18 डिसेंबरपर्यंत भूमिका मांडण्याचे आदेश. राजेश पंडित विरुद्ध मनीषा खत्री प्रकरणाची आज सविस्तर सुनावणी. न्यायालयीन आदेशांचे प्रत्यक्षात पालन शून्य, असा याचिकाकर्त्यांचा आरोप. पिंपळगाव खांब व गंगापूर येथील STP सोडले तर मनपा–MPCB–MIDC–पोलीस कुठलीच कारवाई नाही
संच मान्यता धोरण रद्द करा आणि टीईटीमधील संभ्रम दूर कर अशी मागणी करत शिक्षक संपावर गेले आहेत. राज्यातील तब्बल 80 हजार शाळा आज बंद आहेत. वेतनकपात आदेशानंतरही शिक्षक आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठ वाजता १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. अंधारात मोबाईलवर बोलत उभा असताना बिबट्याच्या नख्या पोटरीवर ओरखडल्याने तो जखमी झाला, नशीब बलवंतर म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे. तनिषला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या घोळावर राज्य निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली. आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने झापले. हा घोळ टाळता आला असता असेही आयोगाला न्यायालयाने सुनावले.
धुळ्यात टोमॅटोचा दर तब्बल 1000 रुपये कॅरेटवर पोहचला. वाढलेल्या थंडीमुळे टोमॅटो पिकत नसल्याने तब्बल एक हजार रुपये कॅरेटने टमाट्याची विक्री झाली आहे.आठवड्यात 400 ते 500 रुपये कॅरेट प्रमाणे विकले जाणार टोमॅटोला एक हजार रुपये कॅरेट दर मिळाला आहे. थंडीमध्ये टमाट्याची आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाटा महागला आहे.
समर्थ पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुंड मंथन सचिन भालेराव वय 19 वर्षे राहणार भवानी पेठ,पुणे याचेवर पुणे पोलीस आयुक्त यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे. मंथन भालेराव याने आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस त्याचे INSTAGRAM अकाउंट वर ठेवले होते. त्यावेळी तात्काळ समर्थ पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती. Social media च्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांसाठी हा कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या घरासमोरच रात्री पावणेदोन वाजता बिबट्याचे दर्शन झाले आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाची कारवाई अपेक्षित नागरिक करत आहे. निसर्गरम्य धोलवड भागात बिबट्यांचा वावर वाढतेय.. त्यामुळे नागरिकानी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे रात्रीच्या वेळी सावध रहा, बिबट्याच्या हालचाली जाणवल्यास वन विभागाशी संपर्क साधा.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायीच्या लांबच लांब रांगा लागल्या.उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आहे. चैत्यभूमी ते शिवाजी पार्क मैदान परिसरात भीम अनुयायांच्या अभिवादन करण्यासाठी आजच मोठ्या रांगा लागल्या आहेत. गावाखेड्या पाड्यातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाला आहे