AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, उद्धव ठाकरेंचा आमदार महायुतीच्या गोटात? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politcs : राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या दाराने जिल्हा बँकेच्या निवडवणुकीत महायुती पॅनलला पसंती दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, उद्धव ठाकरेंचा आमदार महायुतीच्या गोटात?  राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Jun 25, 2026 | 10:36 AM
Share

९ पैकी ६ खासदार फुटल्याने उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसलाय. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी अचानक साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे आखले आहेत. ठाकरेंच्या निशाण्यावर आता बंडखोर खासदार आहेत. तर दुसरीकडे खासदारांनंतर आमदार देखील फुटणार असल्याचा दावा महायुतीमधील नेते करत आहेत. या दावादरम्यान उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलला पसंती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत चक्क भाजप आणि महायुतीसोबत जाण्यास पसंती दर्शवली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पॅनल झाले आहेत. यामुळे अंबादास दानवे यांनी मविआऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली आहे. ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत ८ जण बिनविरोध संचालक झाले आहेत. यंदा १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मविआचे पॅनल बनले आहे. या दोन्ही पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. विशेष म्हणजे मविआचे पॅनल बनले असतानाही अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.

बँक निवडणुकीतील हा निर्णय स्थानिक पातळीवरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण बाबीवर बँकेत पक्षीय राजकारण नसते, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय असल्याचेही अधोरेखित केले. अंबादास दानवे यांच्या भूमिकेवर पक्षातील वरिष्ठ नेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दानवेंच्या भूमिकेवर पक्षातील वरिष्ठ नेते काय बोलतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार