शत्रू बाहेर नाही घरातच असतो… 32 कोटींसाठी फुलप्रूफ मर्डर प्लान, घडलं तरी काय? पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

काही भयानक घडलं की आपण कायम बाहेरच्या लोकांवर संशय घेतो, पण खरा आरोपी आपल्याच बाजूचा आणि विश्वासू असतो... अता देखील असंच काही झाली, वसई येथे 32 कोटींसाठी फुलप्रूफ मर्डर प्लान करण्यात आला... याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून, कसून तपास सुरु आहे.

शत्रू बाहेर नाही घरातच असतो... 32 कोटींसाठी फुलप्रूफ मर्डर प्लान, घडलं तरी काय? पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
| Updated on: Aug 01, 2026 | 12:06 PM

कोणतीही घटना घडली की, आपण बाहेरच्या लोकांवर संशय घेतो. पण अनेकदा शत्रू आपल्या बाजूलाच असतो. पण त्या व्यक्तीवर आपला विश्वास असल्यामुळे तिच्याकडे आपण कधी संशयाच्या नजरेने पाहातच नाही. आता देखील असंच काही झालं. सांगायचं झालं तर, व्यवसाय कायम विश्वासाच्या जोरावर चालतो. पण वसई येखील व्यवसायिक नात्याची कहाणी अशी समोर आली की, जेथे विश्वासाची जागा 32 कोटी रुपयांनी घेतली. 32 कोटींची परडफेड टाळण्यासाठी एका उद्योजकाने त्याच्याच पार्टनरच्या मर्डरचा फुलप्रूफ प्लान तयार केला… सुरुवातील पार्टनरवर कोणालाच संशय आला नाही. पण पोलिसांनी सत्य अखेर शोधूनच काढलं…

हे प्रकरण डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील ‘जीएसएम फॉईल्स लिमिटेड‘चे (GSM Foils Limited) आहे. 24 जुलै रोजी, कंपनीचा पार्टनर मोहनसिंग लक्ष्मणसिंग परमार हे नेहमीप्रमाणेच परिसराबाहेर पडत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पहिली गोळी परमार यांना लागली. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी फरार झाली. अखेर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसून चौकशी केली आणि धक्कादायक सत्य समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी उद्योजकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेथे त्यांनी सर्जरी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला हे प्रकरण व्यावसायिक स्पर्धेतून उद्भवल्याचे वाटत होतं, परंतु जसजसा तपास पुढे सरकला, तसतसा एक धक्कादायक आरोप समोर आला. वालीव पोलिसांच्या माहितीनुसार, या संपूर्ण कटाचा सूत्रधार एखादा बाहेरील शत्रू नसून खुद्द कंपनीतीलच एक भागीदार सागर गिरीश भानुशाली असल्याचं निष्पन्न झालं.

तपासात असं समोर आलं आहे की, शेअर बाजारात मोठं नुकसान आणि कर्जाचं डोंगर झाल्यानंतर सागर गिरीश भानुशाली याने मोहनसिंह परमार यांच्याकडून 32 कोटी रुपये घेतलेले. पोलिसांचा असा आरोप आहे की, जर मोहनसिंह यांची हत्या झाली असती तर, एवढी मोठ्या रकमेची परतफेड करावी लागली नसती आणि कंपनीवर असलेली त्यांची पकड देखील मजबूत झाली असती.

त्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक तपास पद्धतीचा अवलंब केला. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली, कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले, डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे गोळा केले गेले आणि खबऱ्यांकडून माहिती मिळवण्यात आली. या धाग्यांच्या आधारे पोलिसांचा तपास महाराष्ट्रातून थेट उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला. तिथे पोलिसांनी मुख्य संशयित शूटर सुजित देवेंद्रभाई पांडे याला, तसेच त्याचा साथीदार अनुप वीरेंद्र प्रजापती, शस्त्र पुरवठादार मनोज थथेरा आणि इतर आरोपींना अटक केली. या प्रकरणात गिरीश भानुशाली सोबत सात जणांना अटक केली असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us