Medical Student Accident | ‘त्यांनी स्नॅक्स मागवला, केक कापला, नंतर…’ हॉटेल मालकाने सांगितली वर्धा अपघातापूर्वीची कहाणी

| Updated on: Jan 27, 2022 | 1:36 PM

त्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी गेल्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला. या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी बर्थ डेचं सेलिब्रेशन केलं, तसेच ज्या ठिकाणी ते थांबले त्या हॉटेल मालकाने आता प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सर्व हकीकत सांगितलीय.

Medical Student Accident | त्यांनी स्नॅक्स मागवला, केक कापला, नंतर... हॉटेल मालकाने सांगितली वर्धा अपघातापूर्वीची कहाणी
wardha accident
Follow us on

वर्धा : सोमवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी मध्यरात्री वर्धा जिल्ह्याच्या (Wardha Accident) सेलसुरा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा (Medical Student Accident) जागीच मृत्यू झाला. या हादरवून सोडणाऱ्या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताला दोन दिवस होऊन गेले असले तरी लोक या धक्क्यातून बाहेर पडलेले नाहीत. मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी गेल्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला. या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी बर्थ डेचं सेलिब्रेशन (Birthday Celebration) केलं, तसेच ज्या ठिकाणी ते थांबले त्या हॉटेल मालकाने आता प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सर्व हकीकत सांगितलीय.

अपघातापूर्वी विद्यार्थ्यांनी काय केलं, हॉटेल मालकाने सांगितलं…

माँ की रसोई या रेस्टॉरंमध्ये हे विद्यार्थी आले होते. त्या रेस्टॉरंटच्या मालकाने टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली. “ते साते ते साडेसातच्या दरम्यान माझ्या हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी माझ्याकडून स्नॅक्स घेतले. माझ्या हॉटेलच्या मागे एक गार्डन आहे. त्या गार्डनवर ते बसले. तेथे त्यांनी केक कट केला. माझ्यासाठी ते सर्व लोक नवे होते. साधारणत: अकरा वाजता त्यांनी बील पे केलं. साडे अकरा वाजता ते येथून निघून गेले. त्यांनी मद्य प्राशन केले किंवा नाही, याबात मला माहिती नाही. मी किचनमध्ये होतो,” असं हॉटेलच्या मालकाने सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं ट्विट

दरम्यान, हे सर्व विद्यार्थी नेमके गेले कुठे होते, याबाबत चर्चा सुरु होती. मात्र हॉटेलमधील  सीसीटीव्ही समोर आल्यानंतर हे सर्व यवतमाळ जिल्ह्यात नसून वर्धा जिल्ह्यातच गेले असल्याचं समोर आलंय. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले होते. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत दुःख व्यक्त केलं होत. तसंत अपघातातील मृतांच्या नातेवाईंकांना आर्थिक मदतीचीही घोषणा केली होती.

इतर बातम्या :

Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?

Delhi Gang Rape | 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, केस कापून महिलांनी धिंड काढली, दिल्लीत पुन्हा निर्भया

Nagpur Police | नागपुरातून मोबाईल चोरीला, परत मिळण्याची शक्यता नव्हती; प्रजासत्ताकदिनी 17 जणांना गूडन्यूज!